मुंबई

गणेशोत्सवाची मुंबई, ठाणेकरांना भेट; मोडकसागर, तानसापाठोपाठ आणखी एक धरण ओव्हरफ्लो

राहुल क्षीरसागर

ठाणे : गत काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण तलावातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे तीन-चार दिवसांपूर्वी मोडकसागर आणि काल तानसा धरण भरून वाहू लागले. या दोन्ही तलावांपाठोपाठ शुक्रवारी आणखी एक धरण भरल्याने मुंबई-ठाणेकरांना गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुढील वर्षभर पाणीपुरवठ्याचे संकट टळल्याने त्यांना गणेशोत्सवाची एकप्रकारे भेटच मिळाली.

ठाणे जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीपातळी 50 टक्केही भरली नव्हती. त्यामुळे यंदा पावसाने ओढ दिल्यास भविष्यात पाणी टंचाईचीचे सावट निर्माण झाले होते. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासह धरणांच्या क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली.

त्यातच शहापूर तालुक्यातील भातसा धरणातून मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यातच तीन-चार दिवसांपूर्वी मोडकसागर धरण भरुन वाहू लागले आहे. त्यानंतर तानसा आणि आता भातसा धरणाच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे भातसा धरणातील पाणीपातळी नियमीत ठेवण्यासाठी धरणाचे तीन दरवाजे शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास 25 सेमीने उघडण्यात आले. त्यामुळे धरणातून 69 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. भातसा धरण भरल्याने ठाणे जिल्हावासियांची पाण्याची चिंता मिटली आहे.

दरम्यान, भातसा धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे भातसा नदी किनाऱ्यावरील शहापूर – मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांना दिल्या. तसेच जीवितहानी होवू नये याकरिता उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या.
----
संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT