मुंबई

कोकणपट्ट्यात अंबर अलर्ट जारी; मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

समीर सुर्वे


मुंबई : पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने मुंबई, पालघर वगळता संपूर्ण कोकणात पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अंबर अलर्ट जारी केला असून समुद्रातील वारेही वेगाने वाहणार आहेत. दरम्यान, मुंबईत आज सकाळी पावसाच्या हकल्या सरी पडल्यामुळे तापमान 2 ते 3 अंशांनी घसरले आहे. 

पश्‍चिम बंगालच्या उपसागरात 20 सप्टेंबरपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. या जिल्ह्यातील काही भागांत 204 मि.मी. पर्यंत पावसाची शक्‍यता असल्याने मंगळवारपर्यंत (ता. 22) अंबर अलर्ट जारी केला आहे. यासाठी नाविक दल, तटरक्षक दल, तसेच स्थानिक प्रशासनाला सज्जतेचा इशारा दिला आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यात मंगळवारपर्यंत जोरदार पावसाची शक्‍यता असून मुंबई आणि पालघरमध्ये हलक्‍या सरींचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबईत आज सकाळी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात 2 ते 3 अंशांची घट झाली आहे. पुढील दोन दिवस मुंबईत तापमान याच पातळीवर राहण्याची शक्‍यता आहे.
अशी झाली तापमानाची नोंद (अंश सेल्सिअसमध्ये)

                 कमाल     किमान
कुलाबा       28          25.5 
सांताक्रुझ    28.8       25 अंश 

जोरदार वारे वाहणार
बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्‍चिम किनारपट्टीवरही जोरदार वारे वाहणार आहे. अरबी समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मासेमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन वेधशाळेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT