मुंबई

कोरोनाने मुंबईतली नोकरी गेली; चक्री वादळाने बंगालमधील घरही उद्धवस्त झाले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना आणि चक्रीवादळ एकाचवेळी धडकल्याने अनेकांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. मूळचे पश्चिम बंगालमधील असलेले, पण मुंबईत काम करणाऱ्यां अनेकांची अवस्था बिकट झाली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थानसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन आहेत, पण पश्चिम बंगालसाठी या खूपच कमी ट्रेन रवाना झाल्यामुळे बंगालमधील अनेक जण मुंबईतच अडकलेले आहेत.

चक्रीवादळ पश्चिम बंगालला धडकल्यानंतर काही तासांपासून मी घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे, पण अजून संपर्क होत नाही. का झाले ते कळत नाही. अनेक मित्रांशी संपर्क साधला, पण त्यांनाही काही माहिती नाही आणि मी मुंबईत अडकलो आहे, असे बंगालमधील अनेकांनी सांगितले. काहींनी आमचे कुटुंबिय सुरक्षित आहेत, पण घर गेले आहे. आता घरी जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. नोकरी नसल्यामुळे जवळच्या कोणाकडेही पैसे नाहीत, अशी खंतही व्यक्त होत आहे

पैसे कमावण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आलो. आता नोकरी गेली आणि गावाकडचे घरही गेले. वादळामुळे गावाकडची आमची शैती वाहून गेली आहे. नोकरी नाही. मलाच काही खायला नाही, तर कुटुंबियांना काय पाठवणार अशी विचारणा झवेरी बाजारातील अनेक कर्मचाऱ्यांनी केली. येथील अडीच लाख कामगार पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगण्यात येते. 
आमच्या मालकांनी पगार देता येत नाही. गावाला जायचा सल्ला दिला आहे, पण गावी जाणार कसे, जायला पैसे नाहीत. गावाकडचे घर तुटले आहे. आम्ही एकमेकांना मदत करुन खाण्याची सोय करीत आहोत, पण गावाकडे जायला कोणाकडेच पैसे नाहीत, असे सांगितले जाते. 

झवेरी बाजारमधील अनेक दुकानदारांनी आम्ही सुरुवातीस कामगारांना पैसे दिले. खायलाही दिले, पण आता आमचाही धंडा दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यांना गावाकडे परत जायला हवे यासाठी मदतही करीत आहोत. त्यातील अनेकांना नोंदणीसाठी मदत केली, पण जास्त ट्रेनच जात नाहीत. आम्ही काहींनी बसची व्यवस्था करुन देण्याचा प्रयत्न केला, पण तेही शक्य झाले नाही. 

पश्चिम बंगालला श्रमिक स्पेशल जाण्यास सुरुवात झाली, पण काही दिवसातच अम्फान चक्रीवादमुळामुळे ती थांबवण्याचा निर्णय झाला. परतीचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. काहीजण 8 ते 10 हजार खर्च करुन गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण ते निघताना आम्ही मुंबईत पुन्हा परतणार नाही असे खेदाने सांगतात. आता झवेरी बाजार कसा उभा राहणार हा प्रश्न आहे. अनेक कामगार दहा वर्षापासून काम करीत होते. मालकांचा त्यांच्यावर विश्वास होता. आता नवे कामगार आले तरी ते किती कुशल असतील तसेच त्यांच्यावर विश्वास किती असणार हा प्रश्न असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT