मुंबई

कोरोनाने मुंबईतली नोकरी गेली; चक्री वादळाने बंगालमधील घरही उद्धवस्त झाले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना आणि चक्रीवादळ एकाचवेळी धडकल्याने अनेकांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. मूळचे पश्चिम बंगालमधील असलेले, पण मुंबईत काम करणाऱ्यां अनेकांची अवस्था बिकट झाली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थानसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन आहेत, पण पश्चिम बंगालसाठी या खूपच कमी ट्रेन रवाना झाल्यामुळे बंगालमधील अनेक जण मुंबईतच अडकलेले आहेत.

चक्रीवादळ पश्चिम बंगालला धडकल्यानंतर काही तासांपासून मी घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे, पण अजून संपर्क होत नाही. का झाले ते कळत नाही. अनेक मित्रांशी संपर्क साधला, पण त्यांनाही काही माहिती नाही आणि मी मुंबईत अडकलो आहे, असे बंगालमधील अनेकांनी सांगितले. काहींनी आमचे कुटुंबिय सुरक्षित आहेत, पण घर गेले आहे. आता घरी जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. नोकरी नसल्यामुळे जवळच्या कोणाकडेही पैसे नाहीत, अशी खंतही व्यक्त होत आहे

पैसे कमावण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आलो. आता नोकरी गेली आणि गावाकडचे घरही गेले. वादळामुळे गावाकडची आमची शैती वाहून गेली आहे. नोकरी नाही. मलाच काही खायला नाही, तर कुटुंबियांना काय पाठवणार अशी विचारणा झवेरी बाजारातील अनेक कर्मचाऱ्यांनी केली. येथील अडीच लाख कामगार पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगण्यात येते. 
आमच्या मालकांनी पगार देता येत नाही. गावाला जायचा सल्ला दिला आहे, पण गावी जाणार कसे, जायला पैसे नाहीत. गावाकडचे घर तुटले आहे. आम्ही एकमेकांना मदत करुन खाण्याची सोय करीत आहोत, पण गावाकडे जायला कोणाकडेच पैसे नाहीत, असे सांगितले जाते. 

झवेरी बाजारमधील अनेक दुकानदारांनी आम्ही सुरुवातीस कामगारांना पैसे दिले. खायलाही दिले, पण आता आमचाही धंडा दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यांना गावाकडे परत जायला हवे यासाठी मदतही करीत आहोत. त्यातील अनेकांना नोंदणीसाठी मदत केली, पण जास्त ट्रेनच जात नाहीत. आम्ही काहींनी बसची व्यवस्था करुन देण्याचा प्रयत्न केला, पण तेही शक्य झाले नाही. 

पश्चिम बंगालला श्रमिक स्पेशल जाण्यास सुरुवात झाली, पण काही दिवसातच अम्फान चक्रीवादमुळामुळे ती थांबवण्याचा निर्णय झाला. परतीचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. काहीजण 8 ते 10 हजार खर्च करुन गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण ते निघताना आम्ही मुंबईत पुन्हा परतणार नाही असे खेदाने सांगतात. आता झवेरी बाजार कसा उभा राहणार हा प्रश्न आहे. अनेक कामगार दहा वर्षापासून काम करीत होते. मालकांचा त्यांच्यावर विश्वास होता. आता नवे कामगार आले तरी ते किती कुशल असतील तसेच त्यांच्यावर विश्वास किती असणार हा प्रश्न असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gazette: मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठा पुरावा! कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी अन् मराठ्यांची 'अशी' नोंद

Nepal Protest: नेपाळ हिंसाचारामागील खरा सूत्रधार कोण? प्रसिद्ध रॅपर आणि राजकीय नेत्याचं नाव समोर, हा नेमका आहे तरी कोण?

MS Dhoni करतोय बॉलीवूड पदार्पण? माधवनसोबतचा जबरदस्त ऍक्शन पॅक टीझर आला समोर

Congress and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेसने निर्माण केला पेच? विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर ठोकला दावा!

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT