Devendra Fadnavis speaks about Ajit Pawat that I will say the right thing at the right time 
मुंबई

फडणवीस म्हणाले की, योग्य वेळ आली की बोलेन!

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रातल्या खळबळजनक सत्तानाट्यात काल (ता. 26) अखेर पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला. अजित पवारांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडल्याने भाजपची कोंडी झाली अन् भाजपला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. यावर प्रश्न विचारला असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की योग्य वेळ आली की मी यावर बोलेन.

आज (ता. 27) सर्व आमदारांचा विधानभवनात शपथविधी होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनीही आमदारकीची शपथ घेतली. शपथ घेऊन बाहेर येताना माध्यमांनी त्यांना घेरले व प्रश्न विचारला की अजित पवार ऐनवेळी का माघारी फिरले, यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर अजितदादांबद्दल बोलेन. इतकं बोलून फडणवीस तेथून निघून गेले.

23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. काल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीसांनीही राजीनामा दिला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की राष्ट्रवादीचा एक गट आम्हाला पाठिंबा देण्यास तयार झाला होता, मात्र अजित पवारांनी ऐनवेळी राजीनामा दिल्याने आमचे बहुमत सिद्ध झाले नसते. असे सांगून त्यांनी राज्यापालांकडे राजीनामा सुपूर्द केला. 

अजित पवार सकाळी विधानभवनात शपथविधीसाठी आले असता, सुप्रिया सुळेंनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, मी कायम राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहीन. त्यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तर आज फडणवीस म्हणले आहेत की योग्य वेळ आली की बोलेन, त्यामुळे ते नक्की काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: पानिपतकार विश्वास पाटील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

Kamshet News : कामशेतमध्ये महामार्गालगत कचऱ्याचे ढीग,दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; व्यवस्थापनाअभावी गंभीर परिस्थिती

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सरकारमध्येच जुगलबंदी: भुजबळ-विखे पाटलांमध्ये मतभेद

Sangli Crime News : बड्या नेत्याच्या पीएचा त्रास, पंचायत समितीतील २७ वर्षीय अभियंत्याचा मृत्यू; कृष्णा नदीत मृतदेह सापडल्याने आरोप...

PCMC News : नवनगर विकास प्राधिकरणाच्या जमिनी द्या, पीएमआरडीएची मागणी; अतिक्रमणबाधितसह मोकळ्या जागा हव्यात

SCROLL FOR NEXT