Devendra Fadnavis speaks about Ajit Pawat that I will say the right thing at the right time 
मुंबई

फडणवीस म्हणाले की, योग्य वेळ आली की बोलेन!

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रातल्या खळबळजनक सत्तानाट्यात काल (ता. 26) अखेर पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला. अजित पवारांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडल्याने भाजपची कोंडी झाली अन् भाजपला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. यावर प्रश्न विचारला असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की योग्य वेळ आली की मी यावर बोलेन.

आज (ता. 27) सर्व आमदारांचा विधानभवनात शपथविधी होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनीही आमदारकीची शपथ घेतली. शपथ घेऊन बाहेर येताना माध्यमांनी त्यांना घेरले व प्रश्न विचारला की अजित पवार ऐनवेळी का माघारी फिरले, यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर अजितदादांबद्दल बोलेन. इतकं बोलून फडणवीस तेथून निघून गेले.

23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. काल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीसांनीही राजीनामा दिला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की राष्ट्रवादीचा एक गट आम्हाला पाठिंबा देण्यास तयार झाला होता, मात्र अजित पवारांनी ऐनवेळी राजीनामा दिल्याने आमचे बहुमत सिद्ध झाले नसते. असे सांगून त्यांनी राज्यापालांकडे राजीनामा सुपूर्द केला. 

अजित पवार सकाळी विधानभवनात शपथविधीसाठी आले असता, सुप्रिया सुळेंनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, मी कायम राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहीन. त्यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तर आज फडणवीस म्हणले आहेत की योग्य वेळ आली की बोलेन, त्यामुळे ते नक्की काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT