मुंबई

मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, किरीट सोमय्यांचा सवाल

पूजा विचारे

मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत काही सवाल उपस्थित केले आहेत. अर्णब गोस्वामी यांना ज्याप्रकरणी अटक झाली त्या अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे यांनी जमीन खरेदी केली होती. रश्मी ठाकरे यांच्यासोबत मनीषा वायकर यांचे देखील जमिनीच्या ७/१२ वर नाव आहे. त्यामुळे सोमय्या यांनी या जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांनी बुधवारीही पत्रकार परिषद घेतली होती. 

आजच्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच ठाकरे आणि नाईक कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाले असल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी रेवदंडामध्ये जमीन कशासाठी घेतली? असंही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत सवाल उपस्थित केला आहे.

तसंच रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर व्यवहारासाठी एकत्र का आलेत?, असा प्रश्नही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक परिवाराचे संबंध काय?, असंही ते म्हणालेत.

तसंच उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे का, असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. जमिनीमध्ये एवढी गुंतवणूक का कशासाठी केली? असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

कालच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते किरीट सोमय्या

किरीट सोमय्या म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक आणि या जमीन व्यवहाराचा काही संबंध तर नाही ना? वैयक्तिक कारणामुळे मुख्यमंत्री अर्णब गोस्वामी यांना टार्गेट करत आहेत का ? असा गंभीर सवाल सोमय्या यांनी विचारला. हा जमीन व्यवहार नक्की काय आहे, हे महाराष्ट्राची जनता विचारतेय असं सोमय्या म्हणाले होते.

Does the Chief Minister have a real estate business Kirit Somaiya question

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

SCROLL FOR NEXT