मुंबई

Big News : 20 तारखेनंतर कंपन्या सुरु करायच्यात, मग 'हे' नियम पाळा... 

समीर सुर्वे

मुंबई : कोरोनाची बाध कमी असलेल्या ठिकाणी 20 एप्रिल पासून काही उद्योग आणि व्यवसाय सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र, कर्मचार्यांच्या आरोग्य विम्यासह त्यांना द्यायचा सुविधांची यादीच केंद्राने तयार केली आहे.

कर्मचार्यांना काम करण्याच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच बरोबर प्रत्येक कर्मचार्यांचा उष्णांक तपासूनच त्याला कंपनीत प्रवेश द्यावा तसेच प्रवेश दारावर सॅनिटायझरची सोय करावी असे निर्देश केंद्राने दिले आहेत.

कंपन्यांनी कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीवर अवलंबून न राहाता स्वता वाहानांची सोय करावी. तसेच एका वाहानात 30 ते 40 टक्के लोक राहातील याची खबरदारी घ्यावी. तसेच शिफ्ट बदलताना किमान एक तासाचे अंतर ठेवावे असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.

मालकांनी पाच वर्षा खालील मुलं असलेल्या कर्मचार्याला तसेच ज्या कर्मचार्याला ह्रद्यविकार, मधुमेह रक्तदाब तसेच इतर दिर्घाकालीन आजार आहेत अशांना कामावर बोलवू नका. असा सल्लाही केंद्राने दिला आहे.

कामगारानो हे लक्षात ठेवा 

  • गेट वरुन हात सॅनिटाईज करुनच कंपनीत जा.
  • शक्यतो तोंडावरचा मास्क काढू नका 
  • जेवताना एकत्र बसणे टाळावे 
  • एकमेकांमध्ये किमान 5 फुटाचे अंतर ठेवा.

केंद्र सरकारकडून एक नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीत बसणारेच उद्योग २० तारखेनंतर सुरु करता येणार आहेत. कोरोना कंटेनमेंट झोनमधील उद्योगांना परवानगी नाही.  

'या' बातम्या वाचणं चुकवू नका : 

follow these guidelines if company owners wishes to start their business after 20th april

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मंत्री संजय राठोड याचं वर्चस्व कायम; यवतमाळमधील दारव्हा, नेर पालिकेवर नगराध्यक्ष विजयी

Nagar Panchayat News Sangli : हाय व्होल्टेज ड्रामा झालेल्या सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेत कोणाची आली सत्ता, जयंत पाटील गेमचेंजर

Atpadi Nagaradhyaksh Result: आटपाडीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक, पण नगराध्यक्षपद भाजपकडे; पडळकरांचा दे धक्का

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

SCROLL FOR NEXT