File Photo 
मुंबई

...तर आदिवासींचे कोरोनाने नव्हे, भूकबळीने मृत्यू होतील

सकाळ वृत्तसेवा

विरार : लोकांनी सोशल डिस्टंन्सिंग ठेवावे, घरातच बसावे, या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना आवश्‍यक आहेत, पण ज्यांच्या घरी धान्याचा साठा नाही, अशा आदिवासी-कातकरी लोकांच्या भूकेचा आक्रोश थांबवायचा कसा, असा प्रश्न करत आदिवासींच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल न घेतल्यास पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर कोरोनाने नाही, तर भूकबळीने मृत्यू होतील, असा इशारा माजी आमदार विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

पंडित यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी, रोजंदारीवर असलेले कामगार यांच्या परिस्थितीबद्दलचे पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवून आदिवासींचा भूकबळी जाऊ नये, यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आवाहनही केले आहे. पंडित यांनी पत्रात पालघर जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी आणि मजूरवर्ग यांची हलाखीची परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व लोकांच्या भुकेची काळजी मंत्रिमंडळातील कोणीतरी आधीच घ्यायला हवी होती, असे पंडित यांनी त्यात म्हटले आहे.

आदिवासी विभागाचे दुर्लक्ष! 
लॉकडाऊन काळात आदिवासींची जबाबदारी आदिवासी विभागाने याआधीच घ्यायला हवी होती. हे लोक हातावर पोट असणारे आहेत. अनेक दिवस उद्योगधंदे बंद असल्याने त्यांच्याही हाताला सध्या काम नाही. अशा वेळी त्यांनी पैसे खर्च करून धान्य कसे भरायचे, असेही पंडित यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यांपर्यंत रेशनचे धान्य पोहोचलेले नाही. अपुऱ्या वाहतूक यंत्रणेअभावी गोदामातील धान्य पोहोचत नाही, अशा वेळी या आदिवासी लोकांनी पोटाची खळगी कशी भरायची, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोनाची चिघळती परिस्थिती लक्षात घेऊन आपण यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मी माननीय मुख्यमंत्र्यांना तीन पत्रे पाठवली, पण अतिकामामुळे त्यांना कदाचित त्या पत्रांची दखल घेण्यास वेळ मिळाला नसावा, पण आता परिस्थिती हाताबाहेर चालल्याने अखेर हे अनावृत पत्र पाठवण्याचे पाऊल आपण उचलले आहे. 
- विवेक पंडित,
माजी आमदार 

Former MLA Vivek Pandit's letter to the Chief Minister

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: शुभमन गिलला T20 World Cup संघातून का वगळलं? गौतम गंभीरवर प्रश्नांचा भडीमार अन् मग...

Latest Marathi News Live Update : कोलकाता येथील बांगलादेश उच्चायुक्तालयावर मोर्चा

Crime: सून सासऱ्यासोबत दारू प्यायची; मुलाला राग अनावर झाला, भलताच प्रकार उघडकीस आला, काय घडलं?

निवडणूकांच्या रणधुमाळीत राजकारणावर आधारित ‘आणीबाणी’ आता ओटीटीवर प्रदर्शित; कुठे पाहाल?

Winter Family Vacation Guide: हिवाळ्यात मुलांसोबत ट्रिप प्लॅन करताय? मग आधी 'या' टिप्स नक्की वाचा; एंजॉयमेंट होईल डबल

SCROLL FOR NEXT