youngster. 
मुंबई

तरुणांनो काळजी घ्या! कोरोनाचा तुमच्याभोवतीचा फास आवळतोय...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आता जवळपास तीन महिने होत आले आहे. देशातील रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असला तरी रुग्णांमध्ये तरुणाईचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. 20 ते 40 वयोगटातील तरुणांचा यामध्ये समावेश आहे.राज्यात 48 दिवसांत कोरोनाग्रस्त होण्यात तरुणांची संख्या जवळपास 28 टक्क्यांनी वाढली आहे. 

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनच्या काळाच कामानिमित्त तरुणाईच सर्वाधिक बाहेर पडत आहेत. आणि त्याच कारणांमुळे ते सर्वात जास्त कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. मेडिकल एज्युकेशन अॅण्ड ड्रग विभाग महाराष्ट्राच्या आकडेवारीनुसार, 14 एप्रिल म्हणजेच लॉकडाऊन 1.0 पर्यंत राज्यात 923 लोक पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर, 31 मेपर्यंत कोरोनानेग्रस्त झालेल्या तरुणांच्या संख्येत वाढ होऊन ती संख्या 26, 325 पर्यंत पोहोचली.

कोरोनाचा सर्वाधिक धोका हा वृध्द किंवा ज्यांना दीर्घकालीन आजार असणाऱ्यांना आहे, असे आपण समजत होतो. मात्र, आता तरुणाईच कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. म्हणजे फक्त वृद्ध नाही तर तरुणांना काही आधीच वेगळे आजार असतील आणि कोरोना झाला तर ते धोकादायक ठरू शकतं, हे समोर आलं आहे. 

कोरोनाच्या विळख्यात तरुणाई अडकण्याची प्रमुख दोन कारणे आहेत. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहेत. त्यामुळे ते संसर्गात येत आहेत. तर, दुसरं मुख्य कारण म्हणजे अनेक तरुण लॉकडाऊनचे पालन करत नाहीत. कुटुंबातील इतर कोणी बाहेर पडू नये म्हणुन तरूणच घराबाहेर पडत आहेत. 
- डॉ. ओम श्रीवास्तव , संक्रमण रोगाचे विशेषज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचा ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा झाला की नाही, कसं तपासायचं? वाचा...

Nagraj Manjule : 'एका हयातीत शिवाजी महाराजांनी केलेलं काम एका चित्रपटात मांडणं अशक्य'; असं का म्हणाले दिग्दर्शक नागराज मंजुळे?

सायली-अर्जुन देणार गुडन्यूज? ठरलं तर मग मालिकेत भन्नाट ट्वीस्ट! बाळाच्या विचारात सायलीचं अर्जुनसाठी खास पत्र

Nepal Protest : नेपाळमध्ये हिंसाचार सुरुच, भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले; जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणले

Sakal Newspaper Ranking: ‘सकाळ’ देशात ‘टॉप टेन’मध्ये, वर्तमानपत्रांनी नोंदविली २.७७ टक्क्यांची वाढ

SCROLL FOR NEXT