maharashtra government bhagat singh koshyari announces aid to farmers 
मुंबई

राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर; पाहा अशी मिळणार मदत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : निसर्गाच्या अवकृपेचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांकडून अखेर मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्‍टरपर्यंतच्या जिरायती शेतीवरील पिकांसाठी एक हेक्‍टरला आठ हजार रुपये, तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची प्रतिहेक्‍टरी मदत घोषित करण्यात आली आहे. ही मदत जुन्या निकषाला अनुसरूनच जाहीर करण्यात आली आहे. 

तात्काळ मदत देण्याचे आदेश 
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे मागणी केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जात नुकसानीची पाहणी केली होती. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दोन हेक्‍टरपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजारांची प्रतिहेक्‍टरी मदत; तर बागायत शेतीसाठी, फळबागांसाठी 18 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना तत्काळ देण्याचे निर्देश राज्यपाल कोशियारी यांनी दिले आहेत. याशिवाय, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. राज्यातील 325 तालुक्‍यांत अनेक ठिकाणी 90 ते 100 टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली होती. पावसाच्या कहरामध्ये सोयाबीन, कापसासह खरिपाची पिके पाण्यात गेली होती. 

मदत आणि निकष 

  1. जिरायती शेतीवरील पिकासाठी प्रतिहेक्‍टरी ः आठ हजार रुपये 
  2. बागायती, बारमाही, फळबागासाठी प्रतिहेक्‍टरी ः 18 हजार रुपये 
  3. ही मदत फक्‍त दोन हेक्‍टरपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT