मुंबई

गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईकरांना मिळणार आनंदाची बातमी; दूर होणार मोठे संकट

समीर सुर्वे

मुंबई : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात गणेशोत्सव साधेपणाने साजरे केले जाणार असले तरी गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्रच असणार आहे. गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. गणेशोत्सवाची तयारी सुरु असताना सध्या मुंबईसह सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याचेही चित्र आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईकरांना एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात सध्या 76 टक्के पाणीसाठा जमा आहे. येत्या आठवडाभरातील पावसाचा अंदाज घेऊन गणपतीपूर्वी पाणीकपातीची निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गणपतीपूर्वी मुंबईला 20 टक्के पाणी कपात रद्द होण्याची खुशखबर मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यानच्या काळात पाणीसाठा 80 टक्‍क्‍यांच्यावर गेल्यास कपातीचा निर्णय होऊ शकतो.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आज 10 लाख 9 हजार 445 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. पूर्ण क्षमतेच्या 75.96 टक्के पाणीसाठा आहे. 1 ऑगस्ट रोजी 34 टक्के म्हणजे 5 लाख 1 हजार 160 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता. त्यामुळे 5 ऑगस्ट पासून 20 टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबईत असलेले विहार आणि तुलशी हे दोन्ही तलाव ओसंडून वाहू लागले असून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यातील मोडकसागर हा तलावही आता 90.62 टक्के भरला आहे.

केंद्रीय वेधशाळेने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोर धरला असून तलावांमध्ये 16 दिवसात 5 लाख दशलक्ष लिटरच्या आसपास पाणीसाठा जमा झाला आहे. 22 ऑगस्ट रोजी गणपतीचे आगमन होणार आहे. त्यापूर्वी पाणीसाठ्याचा आढावा घेऊन कपातीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

मुंबईला वर्षभर पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. 2019 मध्ये आजच्या तारखेपर्यंत 13 लाख 56 हजार 012 दशलक्ष लिटर आणि 2018 मध्ये 12 लाख 99 हजार 658 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता. 
---- 
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT