मुंबई

मुंबईकरांनो, गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

समीर सुर्वे

मुंबई : येत्या 22 ऑगस्ट रोजी सर्वत्र गणपतीचे आगमन होणार आहे. यंदा कोरोना संकटामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग कोकणात पसरू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने चाकरमान्यांना 7 ते 14 दिवस क्वारंटाईनची अट घातली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गुरुवारपासून मोठ्या प्रमाणात मुंबईतून चाकरमानी कोकणात जाण्याची शक्यता आहे. 

एवढेच नव्हे तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमारेषेवर चाकरमान्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे, त्यामुळे तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे. त्यासोबत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांचीही अनेक ठिकाणी दुरवस्था झाल्याने वाहतूक संथगतीने सुरु आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांपुढे आता आणखी एक नवं आव्हान उभे ठाकले आहे. या आठवड्यात मुंबई वगळता संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कायम राहाणार आहे. मुंबईत पुढील तीन दिवस हलक्या सरी कोसळणार असून शनिवारी काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. शुक्रवार पासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.त्यामुळे गणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना त्यांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज दिवसभर ढग दाटून होते.मात्र अधून मधून पावसाचा हलका शिडकावा होत होता. पुढील तीन दिवस शहरात हलक्या सरीचा अंदाज आहे.तर कोकणातील इतर जिल्ह्यांच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागात शनिवारी अशीच परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे पावसामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT