File Photo 
मुंबई

कांद्याचे दर आजही चढेच, ही आहे कारणे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कांद्याचे भाव पुन्हा भडकले आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो 50 रुपये भाव असलेला कांदा किरकोळ बाजारात 70 रुपयांना विकला जात आहे. व्यापारी व शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा कांदा साठवून ठेवल्यामुळे कांद्याचे भाव अजून आटोक्‍यात येत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे गेल्या वर्षी कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातच नवा कांदा उशिरा बाजारात आला. त्यामुळे कांदा किरकोळ बाजारात तब्बल दीडशे रुपयांवर गेला होता. त्यानंतर भाव कमी झाले असले, तरी ते पन्नाशीवरच राहिले. गेल्या आठवड्यात एक किलो कांदा घाऊक बाजारात 40 रुपये; तर किरकोळ बाजारात 60 रुपयांना विकला जात होता. या आठवड्यात किरकोळ बाजारात एक किलो कांद्यासाठी 70 रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच बाजारात आलेला कांदा द्वितीय श्रेणीतील आहे.

व्यापारी आणि शेतकऱ्यांनी प्रथम श्रेणीच्या कांद्याची साठवणूक केल्यामुळे भाव खाली उतरत नाहीत, असे भायखळा भाजी मंडईचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी सांगितले. पुढील पावसाळ्यासाठी व्यापाऱ्यांनी आतापासूनच कांदा साठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मागणीनुसार कांद्याचा पुरवठा होत नसल्याने भाव चढेच राहतात. मार्चमध्ये नवीन कांदा बाजारात येण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत कांदा वधारलेलाच राहण्याची शक्‍यता आहे. 

व्यापारी, शेतकरी चांगल्या दर्जाच्या कांद्याची साठवणूक करत आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होत नाहीत. राज्य सरकारने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घालावेत, तरच कांद्याचे भाव आटोक्‍यात येतील. 
- किरण झोडगे,
अध्यक्ष, भायखळा भाजी मंडई

Onion is expensive due to storage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

Ishwarpura News : बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर सलग पाचव्या दिवशी वाहतूक कोंडी; ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

Jaykumar Gore : '...तर पंतप्रधान मोदींसोबत चहा पिण्याची संधी मिळणार'; मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं 'हे' खास कारण

SCROLL FOR NEXT