loan 
मुंबई

लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ; पण कशासाठी? वाचून तुम्हालाही धक्का बसेल...

संजय घारपुरे

मुंबई : मार्चपासून देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद पडले आहेत, त्यामुळे अनेकांवर बेकारीची वेळ आली आहे. आता घरचे पैसे संपल्यामुळे कर्ज काढण्याची वेळ आली आहे. त्यात रेशनसाठीच नव्हे तर पाण्यासाठी कर्ज काढले जात असलेल्या 'अपनालय' या स्वयंसेवी संस्थेच्या पाहणी अहवालात म्हटले असल्याचे वृत्त आहे. कोरोना महामारीच्या आक्रमणामुळे आलेल्या लॉकडाऊनमुळे कोणावर काय वेळ आली आहे हे सांगता येत नाही. आता तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या पाण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे. 

'अपनालय' या स्वंयसेवी संस्थेने एम पूर्व मधील शिवाजी नगर झोपडपट्टीतील 619 जणांचे मत जाणून घेतले. त्यातील 46.7 टक्क्यांनी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कमाई बंद झाली असल्याचे सांगितले. सर्वेक्षणातील 70 टक्के लोकांनी रेशन आणि पाण्यासाठी आपण मित्र तसेच नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले असल्याचे सांगितले. आता जवळपास 80 टक्के लोकांकडे रेशन घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यातील अनेकांना लॉकडाऊन संपल्यावरही परिस्थिती फारशी बदलेल असे वाटत नाही.  

बारा टक्के लोकांनी पाण्यासाठी कर्ज घेतल्याचे सांगितले, तर 42 टक्के जणांनी रेशनसाठी अशी माहीती 'अपनालय' चे रघुनंदन हेगडे यांनी सांगितल्याचेही वृत्तात म्हटले आहे. देवनार डंपिंग ग्राऊंड शेजारील शिवाजी नगर झोपडपट्टीत सहा लाख लोक राहतात. तिथे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहांच्या पुरेशा सुविधा नाहीत. या ठिकाणी प्रामुख्याने कामगार, घरकाम करणारे, छोटे उद्योग करणारे राहतात. त्यांतील अनेकांसमोर कमाईचा प्रश्न आहे. 

झोपडपट्टीत राहणारे अनेक जण योजनांपासून दूर राहतात. कोरोनामुळे आरोग्याचेच नव्हे तर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तिथे काम करणाऱ्यांच्या कामाचा प्रश्न जास्तच गंभीर झाला आहे, याकडे 'अपनालय'चे सीईओ अरुण कुमार यांनी लक्ष वेधले. आता या शिवाजी नगर झोपडपट्टीतील सरासरी उत्पन्न कमी झाले आहे. महिन्याला चार हजार मिळणाऱ्यांची संख्या 17 टक्क्यावरुन 27 टक्क्यांवर गेली आहे. महिना 8 ते 10 हजार कमाई असलेल्यांचे प्रमाण 27 टक्क्यांवरुन 4.8 टक्क्यांवर गेले आहे.
----
संपादन :  ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT