File Photo
File Photo 
मुंबई

वांद्रे किल्ल्यावरून श्रेयाचे राजकारण सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वांद्रे किल्ल्याला सुमारे 300 झोपड्यांच्या अतिक्रमणांच्या विळखा पडला आहे. किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव असल्याने या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न निर्माण झाला असून, बाधितांचा शोध सुरू झाल्याचे समजते. त्यातच किल्ल्याच्या प्रस्तावित सुशोभीकरणावरून श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा तापण्याची शक्‍यता आहे.

वांद्रे किल्ल्याचे सुशोभीकरण करताना आवारात अनेक वर्षांपासून असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन कसे करणार? या कामाला मेरिटाईम बोर्डाची परवानगी आहे का, असे सवाल कॉंग्रेसने उपस्थित केले. पाच कोटींच्या खर्चाने केली जाणारी दिवाबत्तीची व्यवस्था फार काळ टिकणार नाही. अन्य काही प्रश्‍नांची सोडवणूक कशी करणार, याबाबत प्रस्तावात स्पष्टता नाही. वांद्रे किल्ल्याचा विकास अन्य किल्ल्यांसह एकत्रित केल्यास योग्य ठरेल, अशी भूमिका घेत कॉंग्रेसने हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. 

हाच मुद्दा महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनेही उचलला. सुशोभीकरण करताना तेथील 300 झोपड्यांचे पुनर्वसन कसे करणार? प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी आपल्याकडे घरे आहेत का, असे प्रश्‍न शिवसेनेनेही उपस्थित केले. मुंबईत अन्य किल्लेही आहेत; या सर्व किल्ल्यांच्या सुशोभीकरणाचा एकत्रित प्रस्ताव आणावा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली. शिवसेनेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याने भाजप एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा स्थानिक विषयावर राजकारण तापू लागले आहे. 

प्रस्तावात काय? 
सुशोभीकरणात वांद्रे किल्ल्याच्या परिसरातील मोडकळीला आलेली संरक्षक भिंत पाडून पुन्हा उभारली जाणार आहे. शोभिवंत जाळ्या, सुशोभित प्रवेशद्वार, शौचालये, गांडूळखत तयार करण्यासाठी खड्डा, बसाल्ट दगडाचे पदपथ, वारसा वास्तू सूत्रानुसार दिशा, चिन्हे आणि नावांच्या पट्ट्या, पाणवठे, बैठक व्यवस्थेची दुरुस्ती, विजेचे दिवे, हिरवळ आदी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी 20 कोटी रुपये खर्च येणार असून त्याचे कंत्राट ए. पी. आय. सिव्हिलकॉन या कंपनीला दिले जाणार आहे.

The politics started from Bandra fort

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT