विद्यापीठ परीक्षांवरून आजी-माजी शिक्षणमंत्र्यांमध्ये जुंपली; एकमेकांना कडक शब्दांत प्रत्युत्तर  
मुंबई

विद्यापीठ परीक्षांवरून आजी-माजी शिक्षणमंत्र्यांमध्ये जुंपली; एकमेकांना कडक शब्दांत प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील तृतीय वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि भाजपचे आमदार ऍड. आशीष शेलार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राज्य सरकारने अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला असताना भाजप आमदार आशीष शेलार यांनी बॅकलॉग व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना सरकारने वाऱ्यावरच सोडले का? असा प्रश्‍न विचारत राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसूत्री निर्णय नसून, हे शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे पाप असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे, असे म्हणत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. 

अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात राज्य सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रम व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम हा पहिला, तर एटीकेटीचा दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यांत निर्णय घेतले आहेत. त्यातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा रद्द केल्या आहेत व त्यांना पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मार्क वाढवायचे असल्यास त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सामंत यांनी सांगितले.

सत्तेत असताना काळजी का वाटली नाही? 
राज्यातील 3 लाख 41 हजार 308 एटीकेटी आणि बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांबाबतीत स्पष्ट धोरण आहे. सगळ्या कुलगुरूंशी येत्या दोन-तीन दिवस मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करून निर्णय जाहीर करू, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच याबाबत गेले पाच वर्षे विरोधक सत्तेत असताना त्यांना विद्यार्थ्यांची काळजी वाटली नाही का, असा टोला सामंत यांनी लगावला. 

विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणे मंत्री म्हणून बंधनकारक समजत नाही. विरोधकांनी टीका करत राहावी, आम्ही काम करत राहू.
- उदय सामंत, उच्च शिक्षण मंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT