तेल गेले तूप गेले... हाती आले धुपाटणे! मुंबईतील चाकरमान्यांची बिकट अवस्था... 
मुंबई

तेल गेले तूप गेले... हाती आले धुपाटणे! मुंबईतील चाकरमान्यांची बिकट अवस्था...

सकाळ वृत्तसेवा

महाड : लॉकडाऊनच्या काळात मुंबई व अन्य ठिकाणाहून गावी परतलेल्या चाकरमान्यांपुढे आता उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गावी असणारी शेत जमीन व इतर मालमत्ता विकून टाकल्याने शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नालाही मुंबईतून नोकरी सोडून आलेल्या चाकरमान्यांना मुकावे लागले आहे. त्यामुळे नोकरी सोडली अन् शेती गमावली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

कोकणातील ग्रामीण भागामध्ये असणारा चाकरमानी मुंबईमध्ये नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाला आहे. तसेच पुणे, सुरत या भागातही येथील चाकरमानी वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. अनेक चाकरमानी मुंबईहून पायी चालत गावी कसेबसे परतले. परंतु आता या चाकरमान्यांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात एक लाखाहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. दक्षिण रायगडमध्ये चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. महाड तालुक्यात तब्बल अकरा हजार चाकरमानी परत आले. या सर्वांना आता उपजिविकेचा प्रश्न भेडसावत आहे. यापूर्वी गावी असणारी शेती व इतर मालमत्ता ही उपजिविकेचे साधन होते; मात्र अनेकांनी आपल्या जमिनी विकून टाकल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे शेती करण्यासाठी तसेच इतर उत्पन्न घेण्यासाठी जमीन शिल्लक नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही अपवादात्मक चाकरमान्यांकडे जमीन शिल्लक होती. त्यांनी या काळात शेती व भाजीपाल्याचे प्रयोग केले. परंतु ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. मुंबईतील रोजगार गेला आहे व गावाकडे शेती नाही अशा परिस्थितीत चाकरमानी सापडलेला आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थिती पूर्वपदावर येण्याची वाट अनेक चाकरमानी पाहत आहेत. 

गावी वडिलोपार्जित असणारी शेती पावसाळा असल्यामुळे विकून टाकली. आज या शेतीचे महत्त्व कळत आहे. शेती नसल्याने आम्हाला आता मुंबईचे जनजीवन कधी सुरू होईल याची वाट पाहावी लागत आहे. 
- ज्ञानेश्वर कदम, चाकरमानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT