railway 
मुंबई

देशातील रेल्वेची नियमित वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद? सोशल मीडियावर जोरदार चर्चा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील रेल्वेची नियमित प्रवासी वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद राहणार असल्याचे पत्र आणि संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रेल्वे बंदची चर्चा ही वाऱ्यासारखी पसरली असतांना मध्य रेल्वेने मात्र असा कोणताही निर्णय झाला नसून सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या सेवा सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे. 

देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि लोकल उपनगरीय सेवा सुद्धा 12 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. यामध्ये दिल्लीसाठी धावणाऱ्या राजधानी मात्र सुरू राहणार आहे. त्याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  धावणारी उपनगरीय सेवा ही सुरूच राहणार आहे. 

तर 1 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत बुकिंग करण्यात आलेल्या तिकीट सुद्धा रद्द केल्या असून त्याचा परतावा सुद्धा देण्यात येणार आहे. यापूर्वी 30 जूनपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता.  

रेल्वेकडून कोणतीही अधिकृत घोषणा नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने 12 ऑगस्ट पर्यंत सर्व रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र, यावर अद्याप रेल्वे बोर्डाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या उपनगरीय गाड्या सुरूच राहतील. या व्यतिरीक्त उपनगरीय गाड्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
- प्रविण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT