मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आलाय. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनापासून देशातल्या विविध शहरांमधील बेघर असलेल्या आणि आपल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची काही दिवसांपूर्वी मुंबईतील स्थानकांवर बस स्टॅन्डवर गर्दी झाली होती. अशात लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक आपापल्या घरी पोहोचलेले नाहीत.
मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस LTT वर अशा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागरिकांना अन्न आणि निवारा मिळणं खूप अवघड झालं होतं. लोकांना रस्त्यावर यावं लागतं आहे. अशा लोकांची अन्नाची आणि राहण्याची वानवा होताना पाहायला मिळतेय.
अशा सर्व नागरिकांना मदत करण्यासाठी आज म्हणजेच २ एप्रिलपासून राज्य शासनाच्या सिव्हिल डिफेन्स विभागानं मुंबईतील वर्सोवा इथे एक कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पमध्ये या स्थलांतरितांची, बेघर लोकांची आणि कामगारांच्या निवाऱ्याची आणि अन्नाची सोय करण्यात आलीये.
कॅम्पमध्ये काय असतील सुविधा:
याबाबतची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी आणि महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात हा कॅम्प म्हणजे बेघर आणि स्थलांतरित लोकांसाठी स्वतःच घर असणार आहे.
relief camp starts in versova mumbai durind crisis scenario of novel corona virus covid19
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.