section 144 
मुंबई

कोरोना रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचा आदेश दिला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी अनावश्‍यक गर्दी टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्‍यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र जमण्यावर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख गृह विभागाशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळल्यावर राज्य सरकारने चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल, व्यायामशाळा आणि तरणतलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 
राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि पूर्वी दिलेली परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आणि विनाकारण प्रवास न करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पर्यटन कंपन्यांना देशात आणि परदेशांत समूह सहली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई दर्शन सहलीही 31 मार्चपर्यंत थांबवण्यात आल्या आहेत. 

कलम क्र. 144 म्हणजे काय? 
फौजदारी दंड संहितेमधील (1973) कलम क्र. 144 मोठ्या संख्येने जमाव झाल्यास, त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतल्यास अथवा मानवी जीव आणि आरोग्याला धोका असल्यास लागू केले जाते. अशा परिसरात चार किंवा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घातली जाते. कोणत्याही भागात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जमावबंदी करता येत नाही. दोन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा जमावबंदीचा आदेश काढता येतो. नागरिकांचे जीवित व आरोग्याला धोका आणि दंगलीची शक्‍यता असल्याचे सरकारला वाटल्यास जमावबंदी सहा महिन्यांपर्यंत लागू केली जाऊ शकते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT