मुंबई

१२ सप्टेंबरपासून मुंबईतून सुटणार स्पेशल गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

भाग्यश्री भुवड

मुंबईः भारतीय रेल्वेने  येत्या १२ सप्टेंबरपासून ८० नव्या स्पेशल ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे.  या रेल्वे गाड्यांच्या तिकिट बुकिंगची सुरुवात १० सप्टेंबरपासून होणार आहे. यावेळी मध्य रेल्वे मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वे सुरू करत आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी आज (5 सप्टेंबर) ही माहिती दिली. 

पुढील सूचना मिळेपर्यंत  १२ सप्टेंबरपासून मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल.  ०२१०९ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून  १२ सप्टेंबरपासून दररोज १८.१५ वाजता सुटेल आणि  मनमाडला त्याच दिवशी २२.५० वाजता पोहोचेल.

०२११० विशेष मनमाड येथून १२ सप्टेंबरपासून पासून दररोज ०६.०२ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला त्याच दिवशी १०.४५ वाजता पोहोचेल. या रेल्वे दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव या स्टेशनवर थांबा घेतील. 

१७ द्वितीय आसन  श्रेणी + ३ वातानुकूलित चेअर कार अशी या रेल्वेची संरचना असेल. या विशेष रेल्वेगाड्या बुकिंगच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

सध्या विविध रेल्वे मार्गांवर २३० विशेष एक्स्प्रेस ट्रेन्स चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये ३० राजधानी एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे.  राज्यांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार रेल्वे गाड्या सुरु केल्या जातील. 

 नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या स्पेशल ट्रेनबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली जाईल. ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे किंवा मोठी प्रतिक्षा यादी आहे तेथे आधी क्लोन ट्रेन सुरु केली जाईल. त्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावर नियमितपणे आणखी ट्रेन सुरु केल्या जातील,, असंही भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी सांगितलं.

(संपादनः पूजा विचारे)

Special trains will leave Mumbai from September 12 Check out the schedule

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT