मुंबई

पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...

संजय घारपुरे

मुंबई : मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा रेल्वेने चांगला उपयोग करून घेतला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामेही रेल्वेने पूर्ण केले. रुळ बदलवणे, ओव्हरहेड वायर्स बदलवणे, सिग्नल यंत्रणा अद्ययावत करणे, रेल्वेमार्गालगत गाळ काढणे आदी काम पूर्ण करण्यात आली. एवढंच नव्हे तर पश्चिम रेल्वेवरील खार आणि वांद्रे दरम्यानच्या दीड किलोमीटरवरील रेल्वेमार्ग अद्ययावत केल्याने पश्चिम रेल्वेची गती वाढण्यास मदत होईल..

खार आणि वांद्रे दरम्यानची असलेली वेगमर्यादा ही चर्चगेट ते विरार दरम्यानची सर्वाधिक होती. त्यामुळे या मार्गावर ताशी 60 किलोमीटरने रेल्वे धावत होत्या. मात्र आता या टप्प्यातही शंभर किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार असल्याचे वृत्त आहे. या वाढीव वेगामुळे प्रत्येक रेल्वेची या टप्प्यातील प्रवासाची वेळ 30 सेकंदाने कमी होणार आहे. अर्थात त्याचमुळे रेल्वेच्या वेगात प्रकर्षाने वाढ होऊ शकेल. 

वांद्रे आणि खार दरम्यान एकूण 17 टर्नआऊट पॉईंट आहेत. त्या ठिकाणी रेल्वे एका ट्रॅकवरुन दुसऱ्या ट्रॅकवर येते. त्यामुळे रेल्वेच्या वेगावर मर्यादा होती. म्हणून  त्याठिकाणी काम करण्यात आले तसेच चारशे मीटरचा ट्रॅक बदलण्यात आला. त्यामुळे रेल्वेची गती वाढणार आहे. हे काम करण्यास अर्थातच लॉकडाऊनचा फायदा झाला. या कालावधीत रेल्वेची वाहतूक कमी असल्यामुळे वेगाने काम पूर्ण करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यामुळे आता या मार्गावरील सर्वच रेल्वेंची गती वाढणार आहे. 

दरम्यान, अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यानच्या फूट ओव्हर ब्रिजचे कामही आता पूर्ण झाले आहे. लॉकडाऊन कालावधीत पूर्ण झालेला तसेच वापरण्यास सुरुवात झालेला हा चौथा ब्रिज आहे.
---
संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT