मुंबई

सुशांतच्या परिवाराने दिलेल्या अल्टिमेटमवर संजय राऊतांचं 'मोठं वक्तव्य, म्हणालेत...

सुमित बागुल

मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनी आजच्या सामानातून नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘ऑपरेशन कमळ’चा संजय राऊत यांनी त्यांच्या स्टाईलने समाचार घेतला. ‘सामना’तून राणेंना भोंदू डॉक्टरांची उपमा देण्यात आली आहे. यानंतर आज संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विविध प्रश्नावर आपलं रोकठोक मत मांडलं. यामध्ये राजस्थानातील राजकारण, महाराष्य्रतील महाविकास आघाडी सरकार, सरकार बद्दल उठवल्या जाणाऱ्या वावड्या, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील बैठकांमध्ये मांडले गेलेलं मुद्दे, आदित्य ठाकरे यांचं सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गोवलं जाणारं नाव, सुशांत सिंह राजपूत प्रकरण, सुशांत प्रकरण आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाने केलेली मागणी या आणि अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.

काय म्हणालेत संजय राऊत : 

  • महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे, अश्या प्रकारचे प्रगोग झाले आणि तर फसले, हा इतिहास आहे
  • राज्यस्थानचं प्रकरण राज्यस्थानात, इथे मुसळधार पाऊस आहे, सगळं वाहून गेलं,  त्यांना प्रयत्न करत राहूदे
  • ऑक्टोबरपर्यंत सरकार राहणार नाही असं म्हणणाऱ्यांना आत्मनंदन म्हणतात
  • इथे खूप प्रश्न आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री पवार साहेब, सर्व मंत्री प्रयत्न करतायत
  • कोणाला सरकार पडणं, अस्थिर करणं, यात रस असेल त्यांनी हे जनतेच्या दुःखावर पोळ्या शेकण्याचं काम करत राहावं, आम्हाला यामध्ये इंट्रेस्ट नाही
  • हे महाराज्यांचं राज्य आहे, इथे जनतेचं हित याला मोठं प्राधान्य दिलं जाईल 
  • प्रधानमंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे मांडतात
  • सुशांत सिंग राजपूतबद्दल मला त्यांची मागणी ठाऊक नाही, मला त्याबद्दल काहीही ठाऊक नाही, मुंबईत खूप काम आहे
  • मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या मागणीबद्दलही ठाऊक नाही
  • केंद्रासंदर्भातही काही विषय आहेत, राजकारण न करता देशाने पुढे जावं, ही आमची स्पष्ट भूमिका आहे
  • सरकार अजिबात अस्थिर नाही आणि अशा प्रकरणांवर जर सरकार अस्थिर होणार असेल तर केंद्राचं सरकार आधी अस्थिर होईल
  • मुंबई पोलिस सक्षम आहेत आणि मुंबई पोलिसच काम करतील, 
  • मुंबई पोलिसांना अस्वस्थ करून, त्यांच्यावर दबाव आणण्याची कोणला दुर्बुद्धी झाली असेल, तर ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो
  • सुशांतच्या परिवाराची मागणी मला ठाऊक नाही, जर आमच्याकडून काही चूक झाली आहे, असं असेल तर आम्ही नक्कीच यावर विचार करू
  • नोटीसीवर आम्ही आणि त्यांचे परिवार काय ते बघू

after targeting rane in samana sushant singh rajput spoke to media about sushant singh rajputs family vs sanjay rauts conflit, raut said if there is mistake from i shall think of apologizing 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

SCROLL FOR NEXT