Kalyan Nevali Airport agitation 
मुंबई

कल्याण: विमानतळाचा प्रश्न पेटला; शेतकर्‍यांवर पॅलेट गनमधून गोळीबार

मयुरी चव्हाण-काकडे

ठाणे - नेवाळी विमानतळासाठी सरकारने शेतकऱ्याची जमीन जबरदस्तीने संपादित केल्याने नेवाळी नाका परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या गाडया जाळल्याने शेतकऱ्यांवर पोलिसांकडून पॅलेट गनमधून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात शेतकरी जखमी झाल्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाविषयी विरोध असून जबरदस्तीने जमीन संपादित केल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगगड मुख्य रस्त्यावरील वाहतूक टायर जाळून बंद केली. आपल्याच मालकीच्या जमिनीवर पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी उग्र आंदोलन सुरू केले आहे. डावल पाडा नाका परिसरात संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना पॅलेट गनमधून गोळीबार करावा लागला. यात चार ते पाच शेतकरी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात संचारबंदी लागू करण्याची शक्यता आहे.

शेतकरी आंदोलनामध्ये सहायक पोलिस आयुक्त सुनिल पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. ब्रिटीश काळात दुसऱ्या महायुद्धावेळी लष्कराने नेवाळी गावाजवळ धावपटीसाठी जागा घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱयांच्या ताब्यात आली होती. परंतु यावर्षी पुन्हा नौदलाने कंपाउंड टाकून त्या जागेवर दावा केला होता. याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. जवळपास या भागातील 7 ते 8 गावांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT