water supply
water supply sakal
मुंबई

महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे उतरले; एक लाखाहून अधिक कुटुंबांना नळ जोडणी

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा (Thane) ओळखला जातो. असे असले तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन फिरावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे चित्र पुसून टाकण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ (Water life mission) अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळजोडणी देण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन लाख ७५ हजार ५७५ घरांना वैयक्तिक नळजोडणीने पाणीपुरवठा (water supply) करण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत एक लाख ३८ हजार ४३६ कुटुंबीयांना वैयक्तिक नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या डोक्यावरील हंड्यांचे ओझे कमी होण्यास मदत होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा यासाठी गावातील प्रत्येक घरात नळ जोडणी उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारमार्फत जल जीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. २०२४ अखेरपर्यंत ग्रामीण भागातील सर्व घंरात नळजोडणी करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक जिल्हा स्तरावर ही योजना राबविण्यात येत आहे. ठाणे ग्रामीण भागातील गाव-पाड्यांमधील महिलांना तसेच पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करत विहीर तसेच हापश्यावर जाऊन डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत होते.

याची गांभीर्याने दाखल घेत, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला जल जीवन मिशन योजना वेगाने राबविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आतापर्यंत १ लाख ३८ हजार ४३६ घरात नळजोडणी देण्यात आल्या असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी या पाच तालुक्यातील ग्रामीण भागासाठी दोन लाख ७५ हजार ५७५ कुटुंबांच्या घरात नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

त्यापैकी आतापर्यंत एक लाख ३८ हजार ४३६ घरात नळजोडणी देण्यात आल्या असून एक लाख १९ हजार १३९ कुटुंबांना २०२४ अखेरपर्यंत वैयक्तिक नळजोडणी देण्यात येणार असून त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत घरांना वैयक्तिक नळजोडणी देण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत एक लाख ३८ हजार घरांना नळजोडणी देऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यात येत असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील. - अर्जुन मारुती गोळे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि. प. ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT