क्षयरुग्णांवर कुटुंबीयांचा अघोषित बहिष्कार 
मुंबई

यशस्वी उपचारानंतरही कुटुंबीय त्यांना स्वीकारत नाहीये!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्षयरोगावरील यशस्वी उपचारानंतर रुग्णालयाने घरी जाण्यास परवानगी दिलेल्या दीडशेहून अधिक क्षयरोगाच्या रुग्णांची अवहेलना होत आहे. स्वतःच्या कुटुंबीयांनी या रुग्णांवर अघोषित बहिष्कार टाकल्याने त्यांच्यावर रुग्णालयातच खितपत पडून राहण्याची वेळ आली आहे.

क्षयरोगावरील उपचारासाठी शिवडीतील पालिकेच्या टीबी रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात १२०० खाटांची व्यवस्था आहे. सध्या ४९८ क्षयरोगाच्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही रुग्ण नव्याने भरती होत आहेत; तर काही रुग्ण दोन ते तीन वर्षांपासून या रुग्णालयात आहेत. यापैकी १५३ रुग्णांवर उपचार पूर्ण झाले असून त्यांना घरी जाण्यास परवानगी आहे. केवळ त्यांना घरी गेल्यावर नियमित औषधे घ्यावी लागतात. या रुग्णांना घरी जाण्याची ओढ लागली असली तरी त्यांचे कुटुंबीय त्यांना घरात घ्यायला तयार नाहीत. बाधित रुग्णांना घरात घेतल्यास आपल्यालाही क्षयरोगाचा संसर्ग होण्याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे काही रुग्ण तर गेल्या पाच वर्षांपासून रुग्णालयात राहत आहेत. 

शिवडीच्या टीबी रुग्णालयात दररोज क्षयरोगाचे सरासरी ४० रुग्ण दाखल होतात. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये ७२ टक्के पुरुष; तर २७ टक्के महिला रुग्ण आहेत. त्यात मुंबईतील ५१ टक्के, इतर जिल्ह्यातील १३.८८ टक्के; तर राज्याबाहेरील रुग्णांचे प्रमाण ३४.७२ टक्के आहे. 

क्षयरोगावर योग्य उपचार उपलब्ध असून तो पूर्णपणे बरा होणारा आजार आहे; मात्र या आजाराबाबत लोकांमध्ये भीती आणि गैरसमज आहे. क्षयरुग्णाला उपचारानंतर घरी नेल्यास आपल्यालाही क्षयरोगाचा संसर्ग होईल, अशी भीती त्यांना असते. त्यामुळे काही नातेवाईक त्यांना घरी न्यायला तयार नाहीत. त्याशिवाय काही रुग्णांना आपण घरी गेल्यास आपल्याला योग्य वागणूक मिळणार नाही, अशी भीती वाटते. त्यामुळे ते स्वतःहून घरी जायला तयार नाहीत. अशा सर्व रुग्णांसाठी सहानुभूतीने रुग्णालयातच निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT