Mumbai esakal
मुंबई

Mumbai : पाणीसाठा घटला; मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात स्थिती गंभीर

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती गंभीर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : लोकसभा निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू असताना यंदाच्या निवडणुकीवर दुष्काळाचे गडद सावट जाणवू लागले आहे. निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी हा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठाही वेगाने कमी होत असून पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

आठवडाभरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या दोन बैठकांमध्ये निवडणूक नजरेसमोर ठेवून डझनावारी निर्णय घेण्यात आले, परंतु दुष्काळी परिस्थितीचा उल्लेखही झाला नाही. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये राज्यात फक्त ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मिळून १५ गावे आणि ४४ वाड्यांमध्ये १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. त्या तुलनेत यंदाची परिस्थिती भीषण असल्याचे आकडेवारीवरून दिसते. शासकीय आकडेवारीनुसार सध्या राज्यातील ७१८ गावे आणि १८८३ वाड्यांना ८८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

मराठवाड्यात २२.४८ टक्के साठा

लातूर जिल्ह्यात फक्त एका गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते, परंतु लातूरसारख्या शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा होत आहे. लातूरसह जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही पाणीप्रश्न गंभीर बनू शकतो. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात विहिरी कोरड्या पडू लागल्यामुळे शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे राहिल्याचे दिसून येते. मराठवाड्यातील सर्व प्रकारच्या एकूण ९२० प्रकल्पांमध्ये २२.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत तिथे ४७.९५ टक्के पाणीसाठा होता.

टँकरची संख्या वाढवावी लागेल

पालघर जिल्ह्यातील सहा गावे आणि २७ वाड्यांमध्ये १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात १८४ गावे आणि ४०६ वाड्या, जळगावमधील २६ गावे तसेच नगर जिल्ह्यातील ३८ गावे आणि २१० वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे जिल्ह्यात ३३ गावे आणि २४६ वाड्या, सांगली जिल्ह्यात ६८ गावे आणि ४८९ वाड्या, सोलापूर जिल्ह्यात सहा गावे आणि ५७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११९ गावे आणि २९ वाड्या, जालन्यातील १०३ गावे आणि ४० वाड्यांना टँकर सुरू झाले आहेत. बुलडाण्यातही दहा गावांना टँकर सुरू असून सरकारी आकडेवारीनुसार नागपूर आणि अमरावती विभागात अद्याप टँकरची गरज भासलेली नाही.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. यापुढे दर आठवड्याला टँकरची संख्या वाढवावी लागेल आणि धरणांतील पाणीसाठाही कमी होत राहील. या परिस्थितीचा सामना करणे नागरिकांसह प्रशासनासाठीही आव्हानात्मक ठरणार आहे. निवडणुकीच्या कामातून प्रशासन पाणी टंचाईच्या परिस्थितीकडे किती आणि कसे लक्ष देते यावरही तीव्रता अवलंबून राहील.

सांगलीत काँग्रेसचा मोर्चा

विभागात जिल्हानिहाय पाणी प्रश्नाचे स्वरूप गंभीर आहे. पाण्यावरून संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते, अशीही अनेक ठिकाणे आहेत. सांगली जिल्ह्यात आताच तशी परिस्थिती निर्माण झाली असून काँग्रेस पक्षाने दोन दिवसांपूर्वी पाण्यासाठी मोर्चा काढला होता. पाण्याचे राजकारण केले जाते आणि कोयना, वारणा धरणातील पाणी मिळण्यासाठी सांगलीला याचना करावी लागत असल्याचा आरोप मोर्चाद्वारे करण्यात आला. ऐन निवडणूक काळात असे प्रश्न हाताळणे प्रशासनासाठीही आव्हानात्मक बनणार आहे.

धरणांतील विभागवार पाणीसाठ्याची टक्केवारी (कंसात गेल्या वर्षीचे आकडे)

औरंगाबाद ः२२.४८ (४७.९५)

नागपूर ः५२.५२ (५३.९०)

अमरावती ः५४.२० (६५.९०)

नाशिक ः ४३.६० (५८.०७)

पुणेः४४.३७ (७७.६०)

कोकण ः ५५.९८ (५२.७५)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: बालिंगा कचरा डेपोला आग; धुरामुळे ग्रामस्थ हैराण!

अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

SCROLL FOR NEXT