boys are not married in belgaum khanapur 
पश्चिम महाराष्ट्र

या गावातील मुलांना मिळेनात मुली ; पालक हैराण 

चेतन लक्‍केबैलकर

खानापूर : "गावात कसलीच सोय ना. धड रस्तो ना. लाईट ना. म्हणून आमच्या पोरांक कोण पोरी देऊक तयार ना. गावात चड पोरांची लग्न होऊचे असंत. सरकाराक सांगोन कळतले काय हे?' भीमगड अभयारण्यातील एका गावातील एकजण "सकाळ'ला सांगत होता. गावात 27 तरुण लग्नाळू आहेत. त्यातील दहा जणांनी तिशी ओलांडली आहे. गावात कोणत्याच सुविधा नसल्याने मुली दिल्या जात नसल्याची नवीच समस्या या गावांमध्ये निर्माण झाली आहे. 

भीमगड अभयारण्यात 13 गावांचा समावेश आहे. एकाही गावाला पक्का रस्ता नाही. नदी-नाल्यांवर पूल नाहीत. कोणत्याच मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. दरवर्षी या भागातील लोक आपल्या समस्या सरकारदरबारी मांडतात. पण, त्याचा काही उपयोग होत नाही. एका केंद्रीय अधिकाऱ्याने नुकतीच भीमगड अभयारण्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी स्थानिकांना स्थलांतर करण्याबाबत सुचविले. मात्र, समस्या सोडविण्यापेक्षा स्थलांतराचा उतारा देऊन पळवाट काढली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पण, नाईलाजास्तव स्थानिकांचा स्थलांतराकडे कल वाढत आहे. 
कोंगळा गावातील सुर्यकांत गावकर म्हणाले, ""स्थानिक लोक निसर्गाशी एकरूप झालेले आहेत. त्यांची वेगळी संस्कृती आहे. ते शहरांशी जुळवून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे, स्थलांतर हा पर्याय होऊ शकत नाही.'' गवाळीतील कृष्णा गावकर म्हणतात, सुविधा नसल्याने मुलांची लग्ने जमेनात म्हणून गाव सोडून जात आहेत. नुकताच गावातल्या चार कुटुंबांनी खानापूरजवळ जागा घेतली. घरे बांधायची ऐपत नसली तरी जागा दाखवून पोरांची लग्न उरकता येतील असे त्यांना वाटते. मात्र, जागा घेण्याची ऐपत नसलेल्यांची परवड सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. 

अभयारण्यासह पश्‍चिम घाटातील अनेक गावांत हीच स्थिती आहे. तरुण गोव्यात गवंडी काम करतात. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेती बंद झाली आहे. एकट्या गवाळीत 200 एकर शेतजमीन पडीक बनली आहे. मुलभूत सुविधा व वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची योग्य भरपाई मिळाल्यास कुणीच गाव सोडणार नाही. पण, सरकारकडून याची दखल कधी घेतली जाणार की नाही, असा प्रश्न आहे. सध्या गवाळी रस्त्यावरील दोन पुलांना मंजुरी मिळाली आहे. रस्ता झाल्यास थोडाफार दिलासा मिळेल. 

सोयी-सुविधांची वानवा असल्यामुळे या भागातील लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्थलांतराची तयारी असली तरी येथील लोक बाहेरच्या परिस्थितीशी जुळवून घेतील, याबाबत शंका आहे. त्यासाठी पायाभूत योजना आखणे हाच उपाय आहे. 
- शामराव जाधव, गवाळी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT