Koyna Dam esakal
पश्चिम महाराष्ट्र

कोयनेत साठा पुरेसा; फक्त योग्य नियोजन हवे'

शेतीला पाण्याचे नो टेन्शन; फेब्रुवारी-मार्चमध्ये काळजी गरजेची

विष्णू मोहिते

सांगली : प्रत्येक वर्षीच उन्हाळ्यात जिल्ह्याच्या पूर्व भागात भूजलपातळीत घट होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरणार नाही. फेब्रुवारी ते एप्रिल मधील टंचाईचा विचार करून आताच नियोजन करावे लागणार आहे. म्हैसाळ, टेंभू, आरफळ योजना सुरू करण्याचे नियोजन पाटबंधारेकडून(irrigation department) व्हायला हवे. शेतकऱ्यांनीही वेळेवर मागणी करायला हवी.

कोयना धरणात (koyna dam)सध्या ८९.३९ (tmc) अशा पुरेसा पाणीसाठ्यामुळे यंदा शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी अडचणीची शक्यता नाही. गेल्यावर्षी फेब्रुवारीत पाणीटंचाई, नंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यंदा पाटबंधारेकडून याच महिन्यात तातडीने पावले उचलली तर सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी धावाधावच करावी लागणार नाही. त्यादृष्टीने नियोजन हवे. कोयना धरण पूर्वेकडील विभागात सिंचनासाठी पाण्याची मागणी झाल्याने कोयना धरण पायथा वीज गृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती (eletricity)करून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद १०५० क्युसेक सोमवारपासून (ता. ३) पाणी सोडण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यासाठी हे पाणी सोडले आहे. याच पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्याची मागणी नोंदवताच पाणी मिळणार आहे. शेती तसेच पिण्याच्या पाण्यासाठी धरणात पुरेसा साठा आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीत मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्‍याच्या दुष्काळी भागासाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणीने जोर धरला होता. त्यासाठी शेतकरी व राजकीय पक्षांनी मंत्री, पाटबंधारे, जिल्हाधिकारी यांना मागण्यांची निवेदने दिल्यानंतर महिनाभरांनी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याची तयारी केली. मात्र शेतकऱ्यांतून मागणी नसल्याने पंधरा दिवसांनी प्रत्यक्ष पाणी सोडण्यासाठी वेळ गेला.

गतवर्षी ५० लाखांवर पाणीपट्टी जमा...

विशेष म्हणजे सन २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी ५० लाखांहून अधिक रोख रकमेत पाणीपट्टी भरली. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात पाटबंधारे अधिकाऱ्यांना यश आले. जलसंपदाच्या नियमानुसार ८१:१९ प्रमाणात पाण्याचे पैसे भरावे लागतात. ते आयत्यावेळी भरण्यापेक्षा महिनाभर तयारी केली तर प्रक्रिया सुलभपणे राबवणे शक्य आहे.

तलाव भरण्याची गरज...

दुष्काळी भागात एप्रिल-मे महिन्यात जिल्ह्यच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई नेहमीच भासते. त्यासाठी टॅंकर सुरू करण्यापेक्षा सिंचन योजना सुरू केल्यामुळे टॅंकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. पूर्व भागातील ग्रामपंचायतींनीही तलाव भरण्यासाठीची रक्कम भरली. यंदाही अशी रक्कम भरल्यास टॅंकर सुरू करण्याची वेळच येणार नाही. मार्च २०२१ मध्ये सिंचन योजनेतून गत वर्षी सुमारे तीन टी.एम.सी पाणी उचलले होते. त्यातून दुष्काळी भागातील तलाव भरून घेतल्यामुळे दुष्काळी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. गेल्या वर्षीही प्रशासनाने जिल्ह्यात किमान दहा टॅंकर लागतील, अशी अटकळ बांधून जाहिरातही प्रसिद्ध केली होती.

कोयना दृष्टिक्षेप

  1. एकूण क्षमता - १०५ टीएमसी

  2. सध्याचा साठा - ८९.३९ टीएमसी

  3. सोमवारपासून सोडलेले पाणी - १०५० क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk’s Tesla: टेस्लाची गाडी आता मुंबईत धावणार; BKC मध्ये पहिलं शोरूम उघडणार, किती आहे किंमत?

Pune: गॅस खरेदी करताय? सावधान! 2 ते 3 किलो गॅसची होतेय चोरी; तरुणांच्या सतर्कतेमुळे काळाबाजार उघड, पुण्यात काय घडलं?

Medical College: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; आमदार जगतापांनी घेतली भेट

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

SCROLL FOR NEXT