sugar factory closed
sugar factory closed  
पश्चिम महाराष्ट्र

श्रीगोंद्यातील चारही कारखाने बंद राहिल्याने शेतकऱ्यांचे हाल

संजय आ. काटे

श्रीगोंदे : जिल्ह्यातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा तालुका अशी शेखी मिरविणाऱ्या श्रीगोंद्यातील चारही कारखाने यंदा बंद राहिले. तालुक्‍याचे राजकारण हाकणाऱ्या तीन नेत्यांच्या अखत्यारीतील हे कारखाने बंद राहिल्याने तालुक्‍यातील ऊसउत्पादकांना बाहेरील कारखान्यांच्या नियोजनावर अवलंबून राहावे लागले.
अधिक वाचा- शाळांसाठी रोटरी उभारणार "व्हर्चुअल क्‍लासरुम' 

काही गावांतील शेतकऱ्यांचे हाल सुरू असून, स्थानिक नेते कारखानेच बंद असल्याने तोंडावर बोट ठेवून आहेत. 
तीस लाख टनांपर्यंत उसाचे उत्पन्न काढणाऱ्या श्रीगोंद्यात गेल्या काही वर्षांत उसाच्या शेतीला घरघर लागली आहे. दर वर्षीच्या तुलनेत काही वर्षांत पावसाचा लहरीपणा वाढला आहे. पाऊसही कमी होत असतानाच कुकडी व घोड धरणातील पाण्याचे नियोजन न झाल्याचा सर्वाधिक फटका उसाच्या शेतीला बसला. परिणामी नागवडे, कुकडी हे दोन सहकारी व दोन्ही साईकृपा या खासगी कारखान्यांनी हंगाम बंद ठेवला.

बाहेरच्या कारखान्यांकडून दुर्लक्ष

तालुक्‍यात यंदाच्या हंगामासाठी दोन लाखांपेक्षा जास्त ऊस शेतात होता. गुऱ्हाळे आणि चारा छावण्या यांना मोठ्या प्रमाणात ऊस तोडला गेला हे वास्तव असले, तरी दिवाळीत पडलेल्या सलग पावसामुळे शेतात उभ्या असणाऱ्या व कमी वाढ झालेल्या उसाच्या पिकाने कात टाकली. त्यामुळे उत्पादन वाढले. मात्र, स्थानिक कारखानेच बंद राहिल्याने ज्यांच्याकडे ऊस आहे त्यांची पंचाईत झाली. येथील कारखाने ज्या वेळी सुरू असतात, त्या वेळी बाहेरील कारखाने येथील शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्य देतात. यंदा मात्र येथील ऊस कुठेही जाणार नाही, याची शाश्‍वती असल्याने बाहेरच्या कारखान्यांनी त्यांच्याप्रमाणे नियोजन केले. 

सभासदांच्या रोषाचा सामना

तालुक्‍यात सध्या अंबालिका, दौंड ऍग्रो, दौंड शुगर, पारनेर, पराग, व्यंकटेश, घोडगंगा आदी कारखान्यांच्या टोळ्या आहेत. तरीही अनेक ठिकाणी ऊस तोडण्यात अडचणी येत असल्याने शेतकरी हताश आहेत. यंदा नागवडे व कुकडी कारखान्यांच्या निवडणुका होत आहेत. हंगाम बंद ठेवून निवडणूक घेण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली आहे. सभासदांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. 

शेतकऱ्यांचा "कार्यक्रम'

चारपैकी कुठलाही एक कारखाना सामोपचाराने सुरू ठेवला असता, तर शेतकऱ्यांचे हाल झाले नसते. मात्र, नेत्यांनी ठरवून शेतकऱ्यांचा "कार्यक्रम' केल्याचे दिसते. 
- अण्णा शेलार, संचालक, नागवडे साखर कारखाना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT