Karnataka State Transport Corporation esakal
कोल्हापूर

Belgaum : बसवर 'जय महाराष्ट्र' लिहून गाडीला फासलं काळं; कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा तात्काळ बंद

बेळगाव आगारातील काही चालकांनी कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस निपाणीतून मागे हाकल्या.

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव आगारातील काही चालकांनी कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस निपाणीतून मागे हाकल्या.

निपाणी : महाराष्ट्रात कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (Karnataka State Transport Corporation) बसेसवर जय महाराष्ट्र असे लिहून काळे फासल्याने कर्नाटक-महाराष्ट्र बसेस (Karnataka-Maharashtra Border Dispute) शुक्रवारी दुपारी बंद झाल्या. विविध आगाराच्या लांब पल्याच्या बसेस निपाणी व कोल्हापूर येथे थांबवून ठेवल्या आहेत. त्याचा परिणाम दोन्ही राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेवर झाला.

शुक्रवारी (ता. 25) सकाळपासून दोन्ही राज्यातील बससेवा (Bus Service) सुरळीत सुरु होती. मात्र, कोल्हापूर येथे कर्नाटकच्या बसेस (Karnataka Bus) अडवून ठेवल्याने महाराष्ट्र बसेसही कर्नाटकात येण्यास मज्जाव केल्याने दोन्ही राज्यातील बससेवा दुपारी 12 नंतर विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांसह मजूर, कामगार, विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. बेळगाव, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेण्णूर, रायचूर या आगारांच्या निपाणी, पुणे, मुंबई, सातारा, औरंगाबाद, नाशिक येथे जाणाऱ्या बसेस कोल्हापूर मार्गावरून बाहेरून सुरु ठेवल्या होत्या. अनेक चालक व वाहकांनी धोका पत्करण्यापेक्षा आपल्या बसेस निपाणी बस स्थानकातच थांबून ठेवल्या.

बेळगाव आगारातील काही चालकांनी कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस निपाणीतून मागे हाकल्या. दुपारनंतर बससेवा सुरळीत सुरु होण्याचे संकेत दिसत होते. मात्र, तीन वाजेपर्यंत केवळ बाहेरून बससेवा सुरु होती. महाराष्ट्र बसेसही (Maharashtra Bus) बंद केल्याने दोन्ही आगारांचा जास्त महसूल बुडाला. प्रवाशांना खासगी वाहनांचा आर्थिक भुर्दंड बसला. दगडफेकीच्या भीतीने खासगी वाहनधारकही महाराष्ट्रात जाण्यास धजावत नव्हते. त्यामुळे निपाणी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली होती. बससेवा बंद असल्याचे समजताच प्रवाशीही बुचकळ्यात पडले. निपाणी आगाराच्या बसेस स्थानकात आल्यानंतर चालकांना त्या थांबविण्याच्या सूचना अधिकारी करत होते. तसेच बसमधून प्रवाशांना उतरले जात होते.

वातावरण तणावपूर्ण झाल्याने व कर्नाटकच्या बसेस कोल्हापुरात अडविल्याने बससेवा बंद करावी लागली. धोका टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या बसेस महामार्गावरून बाहेरून सुरु ठेवल्या आहेत. वातावरण शांत झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व मार्गावरील बससेवा सुरळीत केली जाईल.

-व्ही. एम. शशीधर, विभागीय नियंत्रणाधिकारी, चिक्कोडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT