Savedi's fire station also closed after Kedgaon
Savedi's fire station also closed after Kedgaon 
पश्चिम महाराष्ट्र

अग्निशमन बंब मिळेल का हो..... 

अमित आवारी

नगर : महापालिकेच्या अग्निशमन विभागाबाबत प्रशासनाची अनास्था कायम आहे. कर्मचारी व वाहनांअभावी केडगावपाठोपाठ सावेडीचेही अग्निशमन उपकेंद्र बंद झाले आहे. शहरात मोठी आग लागल्यास महापालिकेकडे पुरेशी वाहनेच नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. महापालिका प्रशासनाच्या अनास्थेचा फटका नगरकरांना बसू शकतो.

नगर : महापालिकेचे केडगाव येथील बंद असलेले अग्निशमन उपकेंद्र. 

महापालिकेच्या अग्निशमन विभागाची तीन केंद्रे आहेत. विभागाकडे दोनच मोठी वाहने आहेत. त्यात केडगावचे केंद्र वर्षभरापासून बंद आहे. सावेडी उपकेंद्रातील मोठे वाहन दुरुस्तीसाठी पाठविले. त्यामुळे तेथील सर्व कर्मचारी माळीवाडा येथील केंद्रात वर्ग करण्यात आले. शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे. नियमानुसार 50 हजार लोकसंख्येमागे एका मोठ्या वाहनाची आवश्‍यकता असते. त्यानुसार नगरसाठी सात मोठी वाहने आवश्‍यक आहेत. प्रत्येक वाहनावर 21 कर्मचारी, असे गृहीत धरल्यास महापालिकेच्या अग्निशमन विभागात 147 कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ 30 कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा कारभार सुरू आहे. हेच पथक आपत्तिव्यवस्थापनाचेही काम करते. त्यामुळे शहरातील आपत्तीविषयी महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याची खंत नागरिक व्यक्‍त करतात. 

अग्निशमन विभागाची स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने मालमत्ताकराच्या दोन टक्‍के अग्निशमन कर आकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मांडल्याचे सांगण्यात आले. प्रस्तावाचा चेंडू "स्थायी'ने महासभेच्या कोर्टात टोलवला. 19 फेब्रुवारीपर्यंत महासभाच न झाल्याने, करवाढीचा निर्णय प्रलंबित आहे. मालमत्ताकरात दोन टक्‍के अग्निशमन कर आकारल्यास, त्यातून येणारा निधी वेगळा ठेवता येईल. त्यातून अग्निशमन विभागाची उपकेंद्रे अद्ययावत करणे, नवीन वाहने खरेदी करणे व मनुष्यबळ उपलब्ध करता येईल. सध्या अग्निशमन विभागात मानधनावर 20 कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. 12 हजार लिटर क्षमतेच्या अग्निशमन वाहनाच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. अर्थात, तोपर्यंत तरी नगरकरांची सुरक्षा "राम भरोसे'च आहे. 

जनतेलाच भुर्दंड 
नगर शहरात कुठे आग लागल्यास महापालिका जवळील नगरपालिकांच्या अग्निशमन विभागाची वाहने पाचारण करते. महापालिकेच्या वाहनांनी आग विझविल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, अन्य नगरपालिकांची वाहने बोलाविल्यास संबंधित मालमत्ताधारकाला या नगरपालिकांकडे शुल्क भरावे लागते. महापालिका अग्निशमन विभागाच्या अपुऱ्या वाहनांचा भुर्दंड, आगीत मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकाला भरावा लागतो. 

स्वतःच करा मालमत्तेची सुरक्षा 
नवीन हॉटेल, हॉस्पिटल, रहिवासी अथवा वाणिज्य इमारतींमध्ये अग्निशमन व्यवस्थेशिवाय महापालिका बांधकामास परवानगी देत नाही. मात्र, जुन्या मालमत्तांमध्ये अग्निशमन सुरक्षा, साधने नसतात. अशी सुरक्षा साधने अल्प दरात बाजारात मिळतात. ही साधने घरात बसविल्यास नागरिक स्वतःच मालमत्तेचे रक्षण करू शकतात. 

वाहने व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागातील उपकेंद्रे बंद पडत आहेत. मनुष्यबळ व वाहनांचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला आहे. 
- शंकर मिसाळ, अग्निशमन विभागप्रमुख, महापालिका 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

Nagpur Crime News : प्रेयसीने बोलणे बंद केल्याने पेटविले दुकान; आरोपीला अटक

Jasprit Bumrah : मुंबईचा खेळ संपला तरी... बुमराह ‘ऑन ड्युटी २४ तास’, वर्ल्ड कपच्या तोंडावर पण मिळणार नाही विश्रांती

Akshaya Tritiya 2024 : सोन्याचा झुमका, हिऱ्याची अंगठी अन् बरंच काही..! अक्षय तृतीयेला पत्नीला गिफ्ट करा 'हे' दागिने

SCROLL FOR NEXT