पश्चिम महाराष्ट्र

अंगठाबहाद्दर सरपंचांपासून मुक्ती शक्‍य; गावगाड्यात होणार बदल

संतोष सिरसट

सरपंच निवडीसाठी सदस्यांची पळवा-पळवी थांबणार

सोलापूरः राज्यात यापुढे होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय झाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबरोबरच सरपंच होण्यासाठी किमान सातवीपर्यंत शिक्षणाची अटही घातली आहे. त्यामुळे भविष्यात गावगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतील. त्याचबरोबर अंगठाबहाद्दर संरपंचांपासून गावाची मुक्ती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरपंच होण्यासाठी आता सदस्यांची पळवा-पळवी होणार नाही.

राज्य शासनाने नगराध्यक्षांच्या निवडी ज्याप्रमाणे थेट लोकांमधून करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे सरपंचही थेट लोकांमधून निवडले जाणार आहेत. राज्यात यापुढे होणाऱ्या जवळपास 28 हजार ग्रामपंचायतीचे सरपंच हे लोकांमधून निवडून येतील. सरपंचांची निवड लोकांमधून करण्याबरोबरच 1995 नंतर जन्मलेल्यांना सातवीपर्यंतच्या शिक्षणाची अट घातली आहे. यापूर्वी सरपंच होण्यासाठी शिक्षणाची अट नव्हती. त्यामुळे गावगाड्याच्या या राजकारणात अंगठाबहाद्दरांची चलती होती. काहीही शिक्षण न घेणारेही सरपंच होत होते. सरपंच झाल्यानंतर महिना-दोन महिने ते अंगठा करुन कारभार चालवीत असत. त्यानंतर ग्रामसेवक व घरातील शिक्षित मंडळींच्या सहायाने ते ओबड-धोबड सही करण्याचा प्रयत्न करत होते. यापुढेही अशिक्षित व्यक्ती ज्यांचा जन्म 1995 पूर्वीचा असेल त्यांना सरपंच पदाची निवडणूक लढवता येईल. मात्र, 1995 नंतर जन्म झालेल्यांना ही निवडणूक लढविण्यासाठी सातवीपर्यंतचे शिक्षण झालेले असणे आवश्‍यक आहे.

ग्रामपंचायत निवडणूक व सरपंच निवडीच्यावेळी भाऊबंदकीचे राजकारण चालते. एकाच घरातील बंधू निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभारतात. त्यातूनच गावामध्ये वैरत्व निर्माण होते. नऊ सदस्य संख्या असलेल्या एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये एक गटाचे पाच तर दुसऱ्या गटाचे चार सदस्य निवडून आल्यानंतर सरपंच होण्यासाठी चढाओढ लागते. त्यावेळी सदस्यांची फोडाफोडी करण्यावर भर असतो. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण होते. त्याचबरोबर जास्त सदस्य संख्या असलेल्या गटातील सदस्यांना देवदर्शनासाठीही पाठविले जाते. त्या सगळ्यांचा खर्च करण्याची तयारीही पॅनेलप्रमुखाने केलेली असते. यापुढे या सगळ्या प्रथांना पायबंद बसून निवडून आलेल्या सदस्यांचे देवदर्शन थांबणार आहे. त्यामध्ये होणारी आर्थिक देवाण-घेवाण कमी होणार आहे.

गावगाड्याच्या विकासाची नवी दिशा
गावासाठी काहीतरी चांगले करण्याची धडपड असलेल्या युवकांना आर्थिक दुर्भिक्षामुळे पैसे खर्च करून निवडणूक लढविणे शक्‍य होत नाही. सुशिक्षित युवकांना यापुढे निवडणुकीसाठी पैसा लागणार नाही. कारण थेट लोकांशी संपर्क साधून गावचा विकास हेच ध्येय ठेवले तर गावगाड्याच्या विकासाची नवी दिशा तयार होण्यास मदत होणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
जियोची ‘धन धना धन’ ऑफर संपतेय; आता पुढे काय?​
500-1000 च्या जुन्या नोटा भरण्यासाठी पुन्हा संधी द्या : सर्वोच्च न्यायालय​
हिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर​
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT