sarpanch 
सोलापूर

सरपंच निवड जनतेतूनच ! ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील एक हजार 570 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 6 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान होणार असून 30 मार्चला मतमोजणी, असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. दरम्यान, या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनतेतूनच होईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. 


राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते जून 2020 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी (ता. 24) जाहीर केला. त्यामध्ये ठाणे (13), रायगड (1), रत्नागिरी (8), नाशिक (102), जळगाव (2), नगर (2), नंदुरबार (38), पुणे (6), सातारा (2), कोल्हापूर (4), औरंगाबाद (7), नांदेड (100), अमरावती (526), अकोला (1), यवतमाळ (461), बुलढाणा (1), नागपूर (1), वर्धा (3) आणि गडचिरोली (296) या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 27 फेब्रुवारीला तहसिलदारांमार्फत निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्यात आली. दरम्यान, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकारची सत्ता आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आपापला पक्ष मजबूत करण्याच्यादृष्टीने आघाडीचे सूत ग्रामपंचायत निवडणुकीत जुळलेले दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे स्वबळावरच स्थानिक गटांद्वारे निवडणूक लढवित असल्याचे चित्र बहूतांश ठिकाणी दिसून येत आहे. 


जुलैमध्ये 27 हजार ग्रामपंचायतींचा टप्पा 
एप्रिल ते जून 2020 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर जुलै ते डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या तब्बल 27 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका नियोजित आहेत. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींच्या सरंपचांची निवड पूर्वीप्रमाणे बहूमताद्वारे केली जाणार आहे. परंतु, एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच जनतेतूनच निवडले जातील, असे निवडणूक आयोगाच्या 24 फेब्रुवारीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT