sarpanch
sarpanch 
सोलापूर

सरपंच निवड जनतेतूनच ! ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील एक हजार 570 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 6 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान होणार असून 30 मार्चला मतमोजणी, असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. दरम्यान, या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनतेतूनच होईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. 


राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते जून 2020 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी (ता. 24) जाहीर केला. त्यामध्ये ठाणे (13), रायगड (1), रत्नागिरी (8), नाशिक (102), जळगाव (2), नगर (2), नंदुरबार (38), पुणे (6), सातारा (2), कोल्हापूर (4), औरंगाबाद (7), नांदेड (100), अमरावती (526), अकोला (1), यवतमाळ (461), बुलढाणा (1), नागपूर (1), वर्धा (3) आणि गडचिरोली (296) या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 27 फेब्रुवारीला तहसिलदारांमार्फत निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्यात आली. दरम्यान, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकारची सत्ता आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आपापला पक्ष मजबूत करण्याच्यादृष्टीने आघाडीचे सूत ग्रामपंचायत निवडणुकीत जुळलेले दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे स्वबळावरच स्थानिक गटांद्वारे निवडणूक लढवित असल्याचे चित्र बहूतांश ठिकाणी दिसून येत आहे. 


जुलैमध्ये 27 हजार ग्रामपंचायतींचा टप्पा 
एप्रिल ते जून 2020 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर जुलै ते डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या तब्बल 27 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका नियोजित आहेत. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींच्या सरंपचांची निवड पूर्वीप्रमाणे बहूमताद्वारे केली जाणार आहे. परंतु, एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच जनतेतूनच निवडले जातील, असे निवडणूक आयोगाच्या 24 फेब्रुवारीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT