Ujani-Dam 
सोलापूर

उजनी 50 टक्क्यांवर! एक TMC पाणी 'असे' वाढते

तात्या लांडगे

दोन लाखांहून अधिक विसर्गाने पाणी धरणात येऊ लागल्यानंतर धरणातून नदीद्वारे पाणी सोडण्यासंदर्भात अलर्ट राहण्याच्या सूचनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

सोलापूर: सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण 50 टक्‍के भरले आहे. धरणात 27 टीएमसीपर्यंत पाणीसाठा झाला आहे. आता लोणावळा, पुण्यातील पावसावर जलसंपदा विभागाने सातत्याने वॉच ठेवायला सुरवात केली आहे. दोन लाखांहून अधिक विसर्गाने पाणी धरणात येऊ लागल्यानंतर धरणातून नदीद्वारे पाणी सोडण्यासंदर्भात अलर्ट राहण्याच्या सूचनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

धरणात दौण्डमधून सध्या 13 हजार क्‍युसेक विसर्गाने पाणी येत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत धरण निश्‍चितपणे 100 टक्‍के भरेल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्‍त केला. मागील उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी मायनस 22 टक्‍क्‍यांपर्यंत गेली होती. त्यामुळे शेतीचे आवर्तन थोडक्‍यात उरकावे लागले होते.

पावसाळ्याच्या सुरवातीलाही धरणातील पाणीसाठा मायनसच होता. मागील काही दिवसांत पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. मृत व उपयुक्‍त साठ्यासह धरणात सध्या 90 टीएमसीहून अधिक पाणी आहे. धरणातील पाणीसाठा 50 टक्‍क्‍यांहून अधिक झाल्याने आगामी काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन धरणाचे दरवाजे उघडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पावसाळा संपेपर्यंत धरण निश्‍चितपणे 100 टक्‍के भरेल. परंतु, आगामी काळात पुणे जिल्ह्यातील पावसाचा अंदाज घेत असताना लोणावळ्यात किती पाऊस पडतो आणि त्याठिकाणाहून पुण्यातून (दौण्ड विसर्ग) धरणात किती पाणी येईल, याचा विचार करून धरणाचे दरवाजे वरिष्ठांच्या परवानगीने उघडले जातील.

- धिरज साळे, अधीक्षक अभियंता पाटबंधारे, सोलापूर

एक टीएमसी पाणी 'असे' वाढते

विविध विसर्गातून धरणात 24 तास 12 हजार क्‍युसेक विसर्गाने पाणी येत राहिल्यास एक टीएमसी (दोन टक्‍के) पाणी वाढते. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळी धरणात 93 हजार क्‍युसेक विसर्गाने पाणी येत होते. आता तो फ्लो कमी झाला असून सद्यस्थितीत 13 हजार क्‍युसेकने पाणी येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत धरणात आणखी दोन-तीन टक्‍क्‍यांपर्यंत पाणी येईल, असा विश्‍वास पाटबंधारे विभागाने व्यक्‍त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT