Swabhimani Sugarcane Conference Decision On 3 Novermber
Swabhimani Sugarcane Conference Decision On 3 Novermber 
पश्चिम महाराष्ट्र

'स्वाभीमानी'च्या ऊस परिषदेचा निर्णय 'या" तारखेला

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर - अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांनी पीकविमा भरला आहे, त्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाल्याशिवाय कंपन्या भरपाई देणार नाहीत. मात्र, शासकीय यंत्रणा निवडणुकीत गुंतल्याने शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थापनेच्या गडबडीत दुर्लक्ष केले आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे झाले नाहीत, तर त्यानंतर राज्यभर ‘स्वाभिमानी स्टाईल’ने उग्र आंदोलन करून सरकारचे डोके ठिकाणावर आणू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला.

ऊस परिषदेचा निर्णय ३ नोव्हेंबरला

स्वाभिमानीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांचा सत्कार आणि स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा ३ नोव्हेंबरला कल्पवृक्ष गार्डनमध्ये घेतला जाणार आहे. यावेळी ऊस परिषदेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. संघटना नेहमीच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत होती आणि राहील, असा निर्वाळाही शेट्टी यांनी दिला.

शेट्टी म्हणाले, ‘‘वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची झोळी तर रिकामी राहिलीच, शिवाय कर्जावरील व्याज मात्र वाढत आहे. कर्जमुक्तीचा गोंधळ, त्यात महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. महापुरातून जी पिके शिल्लक राहिली, ती अतिवृष्टीत नाहीशी झाली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची गरज होती. पंधरा दिवस झाले तरी शेतातील कुजलेली पिके जागीच आहेत. पंचनामे झाल्याशिवाय विमा कंपन्या भरपाई देणार नाहीत, तर दुसरीकडे शासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात दंग आहे.’’

ते म्हणाले, ‘‘सरकार स्थापनेच्या धांदलीत लोकप्रतिनिधींचेही याकडे लक्ष नाही. निसर्गाने मारले असताना किमान शासनाने तरी तारले पाहिजे होते. मात्र, तसे घडताना दिसत नाही. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे आदेश देणे गरजेचे होते. जिल्हाधिकारी, तहसीलदार अथवा विमा कंपन्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला नसेल, तर अशा शेतकऱ्यांना सरकारने मदत करणे अपेक्षित होते. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची जाणीव करून देईल. राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात उग्र आंदोलन करू.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT