State Election Commission
State Election Commission Sakal
पुणे

संसर्ग वाढल्यास निवडणुका लांबणीवर टाका; आयोगाला सरकारचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट कायम आहे. त्यातच सध्या कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्यास, महापालिकेच्या (Corporation) आगामी पंचावार्षिक निवडणुका (Election) लांबणीवर टाकाव्यात, असा प्रस्ताव राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. या प्रस्तावाला विधिमंडळातील दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली आहे.

मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा निवडणूक आयोग घेणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता.३०) पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. पवार यांच्या या माहितीमुळे कोरोना संसर्ग वाढल्यास पुणे व पिंपरी चिंचवड पालिकेची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

राज्यातील १८ महानगरपालिकांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा आणि नगरसेवकांचा कार्यकाळ हा येत्या फेब्रुवारी महिन्यात संपत आहे. या अठरा महापालिकांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांचाही समावेश आहे. या दोन्ही महापालिकांच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु आता ही शक्यता मावळली आहे.

सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी पवार यांनी गुरुवारी पुण्यात मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जोपर्यंत कोरोनाचे संकट दूर होत नाही, तोपर्यंत महापालिका निवडणुका न घेण्याचा निर्णय सर्वच राजकीय पक्षांनी एकमताने घेतला असल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, ‘‘कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर याच्या प्रतिबंधासाठीचे निर्बंध हे कडक करावेच लागणार आहेत. ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे होणारा कोरोना संसर्ग हा याआधीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. परिणामी नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. सध्या राज्यात ओमीक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. परंतु याबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. याबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली जाणार आहे.’’

दरम्यान, भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांनीच अजित पवार यांना भाजपकडे पाठवले होते, अशी चर्चा आहे, असा प्रश्‍न विचारला असता, अजित पवार जोरदार चिडले. सध्या या विषयावर मला बोलायचे नाही. मला वाटेल तेव्हा या विषयावर मी बोलेल. मी केव्हा आणि कसे आणि कुठे बोलायचे, हा माझा अधिकार असल्याचे त्यांनी यावेळी खडसावून सांगितले.

राज्यपालांची शंका पुन्हा दूर करू - पवार

राज्याच्या विधानसभेत महाविकास आघाडी सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. तरीसुद्धा सरकारने समजूतदारपणा दाखवत, राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या आदेशाचा योग्य सन्मान राखला. त्यामुळेच बहुमत असतानाही अध्यक्ष निवडला नाही. सरकारने राज्यपाल आणि त्यांच्या भूमिकेचा मान राखला आहे. त्यांचा अनादर केला नाही.

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीचे नेते पुन्हा एकदा राज्यपाल कोशियारी यांची भेट घेऊन त्यांच्या शंका दूर करणार आहेत. राज्य विधिमंडळाचे यापुढील अधिवेशन सुरू होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत राज्यपालांच्या शंकांचे निरसन केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Video: काय होतास तू काय झालास तू ? इम्रान खान की आजोबा, पाकच्या माजी पंतप्रधानांचा सोशल मिडीयावरील व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Biotin Rich Food : केस, त्वचा, मधुमेह आणि बरंच काही…; बायोटीनयुक्त पदार्थ खा अन् या आजारांची कायमची सुट्टी करा!

SCROLL FOR NEXT