Even after getting married for the second time, divorces is increasing 
पुणे

दुसऱ्यांदा लग्न करुनही ठरतायेत अपयशी !

सनील गाडेकर @sanilgadekar

पुणे : अवास्तव अपेक्षा आणि समजून घेण्याची वृत्तीचा अभाव यामुळे एकदा संसाराचा गाडा थांबल्यानंतर दुसऱ्यांदा केलेल्या लग्नातदेखील त्याच चुका करायच्या. त्यामुळे दुसऱ्या लग्नाची गोष्टदेखील अधुरीच राहत असल्याचे प्रकार होत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या साथीदाराबरोबर पटले नाही म्हणून घटस्फोट घेतला. मात्र, उर्वरित आयुष्य एकट्याने कसे जगायचे म्हणून दुसऱ्यांदा लग्नाचे बेडीत अडकायचे; पण पहिल्या लग्नात घटस्फोट का झाला, याचे आत्मपरीक्षण न करता दुसरी लग्नगाठ बांधल्याने ते लग्नदेखील अपयशी होत आहे. त्यामुळे पुन्हा घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना येथील कौटुंबिक न्यायालयात पाहायला मिळत आहेत.

देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ

कोणत्या चुकांमुळे आपला घटस्फोट झाला. साथीदाराकडून आपण प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या का? किंवा त्यावर विश्‍वास दर्शवला नाही? याचे अनेक जोडपे आत्मपरीक्षण करीत नाहीत. उलट आधीचा साथीदार माझ्यासाठी कसा योग्य नव्हता, हेच त्यांच्या डोक्‍यात असते. तसेच त्याबाबत समुपदेशनदेखील घेतले जात नाही. या सर्व बाबींचा गांभिर्यायाने विचार केला नसेल तर दुसऱ्या लग्नातदेखील घटस्फोट होण्याची शक्‍यता असते. पती-पत्नी दोघेही एकमेकांवर अवलंबून नसतील तर अधिकच गोंधळ होतो, असे अनेक दावे सध्या न्यायालयात प्रलंबित असून, त्यातील काही निकाली लागल्याची माहिती ऍड. सुनीता जंगम यांनी दिली.

मुलांवरूनही होताय वाद
दुसऱ्यांदा लग्न करीत असलेल्या बऱ्याच जोडप्यांना मुलं असतात. या मुलांना आपलेसे न करणे किंवा आधीच्या आई-वडिलांनी मुलांना भेटायचे नाही, असा आग्रह धरल्यामुळेदेखील पती-पत्नीत वाद होतात. त्यातून मुलेदेखील दुखावली जातात. त्यामुळे ताबा असलेला पालक पुन्हा विभक्त होणेच पसंत करतात.

घटस्फोट झालेल्यांनी आत्मपरीक्षण करून व समुपदेशकाची गाठ घेऊनच दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. लग्न झाल्यानंतर साथीदारांची इतरांबरोबर तुलना करू नये. अवास्तव अपेक्षा नसाव्यात, साथीदारांची मानसिक व आर्थिक क्षमता तपासावी. हे सर्व कटाक्षाने टाळले तर दुसऱ्या काय पहिल्याच लग्नात घटस्फोट होणार नाहीत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यातील विश्‍वास आणि अवलंबून राहण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे प्रश्‍न निर्माण होते. - ऍड. सुनीता जंगम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

SCROLL FOR NEXT