Hindus send cows to slaughter says Mohan Bhagawat in Pune
Hindus send cows to slaughter says Mohan Bhagawat in Pune 
पुणे

हिंदूच गायीला कत्तलखाण्यात पाठवतात : मोहन भागवत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यातून गाय कापण्यासाठी पाठवली जात असून, तिला कत्तलखान्यापर्यंत नेणारे ठेकेदार हिंदूच आहेत. आपल्या समाजाला गाईचे वैज्ञानिक महत्व माहिती नसल्याने ती कापण्यासाठी पाठवली जात आहे. हे महत्व माहिती करून दिल्यास प्रत्येक कुटूंब गोपालक बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

गो-विज्ञान संशोधन संस्थेतर्फे "श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार" कोलकाता येथील गोसेवा परिवार संस्था, तळेगाव दाभाडे येथील ज्योती मुंदरगी, भोसरी येथील वैद्य अजित उदावंत, पुण्यातील श्‍याम अग्रवाल आणि पारगाव खंडाळा येथील पूनम राऊत यांना मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो-विज्ञान संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, कार्यवाह बापू कुलकर्णी, शहराचे संघचालक रविंद्र वंजारवाडकर उपस्थित होते.

पाच वर्षानंतर पुन्हा जळाला तिचा संसार; पुण्यातील महिलेची करुण कहाणी

मोहन भागवत म्हणाले, मोठ्या मोठ्या घोषणा करणारे खुप असतात, पण प्रत्यक्षात आणणारे खुप कमी असतात. त्यापैकीच एक मोरोपंत पिंगळे हे एक आहेत. आपण जे काम करतो त्यासाठी मानसिकता, संघटना कौशल्य, दूरदृष्टी कशी असली पाहिजे याचा आदर्श मोरोपंत पिंगळे यांनी आपल्या पुढे ठेवला आहे. गो रक्षेच्या कामातही त्यांनी हा आदर्श निर्माण केला आहे.

सर तुमचा डायलॉग आवडला; बिग बीच्या ट्विटला विराटचे उत्तर

लोक आपल्या घरात गाय ठेवायला तयार नाहीत. आपली ज्या संस्कृतीतून आलो आहोत त्याची कोट्यावधी लोकसंख्या असताना गाय सांभाळायला काय हरकत आहे. पाश्‍चात्य लोक गायीला उपभोगाची वस्तू मानतात त्यामुळे तिची उपयुक्तता असे पर्यंतच तिला सांभाळतात. निसर्गचक्रात सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहेत, त्यामध्ये गाय ही अनिवार्य प्राणी आहे. गाई केवल दुध देते असे नाही, तर निसर्ग आणि मनुष्याचे शरीर व मनावरही तिचा परिणाम करते. मी प्राण्यांचा डॉक्‍टर असल्याने मला हे माहिती आहे, अशी पुष्टीही भागवत यांनी जोडली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयाची जबाबदारी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर

गाईचे वैज्ञानिक महत्व सिद्ध झाले आहे, पण हे वैज्ञानिक भाषेत सांगण्यास सुरूवात केली तर लोकांना समजणार नाही. त्यामुळे विज्ञान निष्ठा आचरणातून दाखवावी व लोकांना समजेल अशीच भाषा वापरावी लागेल. संघासह अनेक संस्था, संप्रदाय गोरक्षेचे काम करत असून, त्यातून देशी गाईचे महत्व पुढे येत आहे. हे कार्य एक व्यक्ती किंवा सरकारचे नाही. तर प्रत्येकाच आपले मन, वचन आणि कर्म बदलावे लागेल. या कार्यात जोडल्या जाणाऱ्या संस्था व मनुष्यबळाची संख्या पहाता पुढील 10 ते 15 वर्षात आपले स्वप्न साकार होऊ शकेल, असा विश्‍वास भागवत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया अत्रे यांनी केले. तर बापू कुलकर्णी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT