junnar market 
पुणे

जुन्नर बाजार समितीला कोरोनाचा मोठा फटका; तब्बल...

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्णयामुळे जुन्नर बाजार समितीचे उपबजार मागील दोन महिने बंद ठेवावे लागले आहेत. यामुळे  दोन महिन्यांत  बाजार समितीच्या उलाढालीत सुमारे दोनशे कोटी रुपयांची घट झाली आहे. याचा फटका प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो, कांदा व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.

सभापती काळे म्हणाले, जुन्नर बाजार समिती जिल्ह्यात अग्रेसर आहे. बाजार समितीचे जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, बेल्हे येथे उपबजार आवार आहेत. मागील वर्षी फळ, भाजीपाला व जनावरे खरेदी विक्रीतून बाजार समितीची सुमारे एक हजार दोनशे  कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. बाजार समितीचा टोमॅटो, कांदा व जनावरे खरेदी विक्रीचा बाजार राज्यात आग्रेसर आहे. बाजार समितीच्या विविध उपबजारात फळे व भाजीपाला खरेदी विक्रीतून रोज तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल होते.

जुन्नर तालुक्या लगत असलेल्या पुणे व मुंबई शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लोकडाउनचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पुणे, मुंबई व अन्य राज्यातील बाजार समितीतील व्यवहार बंद झाले. वाहतूकही  बंद झाल्याने व्यपाऱ्यांनी खरेदी बंद केली. परप्रांतीय  व्यापारी व कामगार निघून गेले. यामुळे २४ मार्च पासून जुन्नर बाजार समितीने उपबजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मागील दोन महिन्यापासून बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले. व्यापाऱ्यांअभावी फळे व भाजीपाला विक्री न झाल्याने शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

खोडद येथील जीएमआरटी (महाकाय दुर्बीण) प्रकल्पामुळे तालुक्यात औद्योगिक विकासाला मर्यादा असल्याने येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेती उत्पादनावर अवलंबून असतो. उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असतो. हा हंगाम वाया गेल्याने पुढील वर्षभर शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कांदा व टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका

कांदा व टोमॅटोची काढणी मार्च महिन्यात सुरू झाली. त्या नंतर आलेल्या कोरोना संकटामुळे उपबजार बंद ठेवावे लागले.टोमॅटो शेतातच लाल झाली.शेतकऱ्यांनी कांदा शेतात झाकून ठेवाला.मात्र वाढलेले तापमान व नुकताच झालेला पाऊस या मुळे  कांदा सडु लागला आहे.टोमॅटोचा उन्हाळी हंगाम वाया गेल्याने व कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, असे सभापती काळे म्हणाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Navratri Fasting Tips: नवरात्रात उपवास करताय? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

SCROLL FOR NEXT