junnar market 
पुणे

जुन्नर बाजार समितीला कोरोनाचा मोठा फटका; तब्बल...

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्णयामुळे जुन्नर बाजार समितीचे उपबजार मागील दोन महिने बंद ठेवावे लागले आहेत. यामुळे  दोन महिन्यांत  बाजार समितीच्या उलाढालीत सुमारे दोनशे कोटी रुपयांची घट झाली आहे. याचा फटका प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो, कांदा व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.

सभापती काळे म्हणाले, जुन्नर बाजार समिती जिल्ह्यात अग्रेसर आहे. बाजार समितीचे जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, बेल्हे येथे उपबजार आवार आहेत. मागील वर्षी फळ, भाजीपाला व जनावरे खरेदी विक्रीतून बाजार समितीची सुमारे एक हजार दोनशे  कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. बाजार समितीचा टोमॅटो, कांदा व जनावरे खरेदी विक्रीचा बाजार राज्यात आग्रेसर आहे. बाजार समितीच्या विविध उपबजारात फळे व भाजीपाला खरेदी विक्रीतून रोज तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल होते.

जुन्नर तालुक्या लगत असलेल्या पुणे व मुंबई शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लोकडाउनचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पुणे, मुंबई व अन्य राज्यातील बाजार समितीतील व्यवहार बंद झाले. वाहतूकही  बंद झाल्याने व्यपाऱ्यांनी खरेदी बंद केली. परप्रांतीय  व्यापारी व कामगार निघून गेले. यामुळे २४ मार्च पासून जुन्नर बाजार समितीने उपबजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मागील दोन महिन्यापासून बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले. व्यापाऱ्यांअभावी फळे व भाजीपाला विक्री न झाल्याने शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

खोडद येथील जीएमआरटी (महाकाय दुर्बीण) प्रकल्पामुळे तालुक्यात औद्योगिक विकासाला मर्यादा असल्याने येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेती उत्पादनावर अवलंबून असतो. उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असतो. हा हंगाम वाया गेल्याने पुढील वर्षभर शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कांदा व टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका

कांदा व टोमॅटोची काढणी मार्च महिन्यात सुरू झाली. त्या नंतर आलेल्या कोरोना संकटामुळे उपबजार बंद ठेवावे लागले.टोमॅटो शेतातच लाल झाली.शेतकऱ्यांनी कांदा शेतात झाकून ठेवाला.मात्र वाढलेले तापमान व नुकताच झालेला पाऊस या मुळे  कांदा सडु लागला आहे.टोमॅटोचा उन्हाळी हंगाम वाया गेल्याने व कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, असे सभापती काळे म्हणाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT