add-k.jpg 
पुणे

पुणे : वकीलबाबूंच्या कामाची गावातच नव्हे तर, जिल्हाभर चर्चा

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवांना परवानगी असली तरी कोरोनाच्या भीतीने अनेक सेवा पुरवठादार आपली सेवा पुरवीत नसल्याने, नागरिकांची गैरसोय होत होती . या पार्श्वभूमीवर मोहाट (ता .जावळी ) येथील पिठाची गिरणी चालू ठेवण्यासाठी  येथील पेशाने वकील असलेल्या 
अॅड. अनिल देशमुख यांनी महिनाभर गावकऱ्यांना स्वतः  पीठ दळून देऊन, भात कांडणी करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या सेवेबद्दल पुण्यातील जावळी तालुका मित्र मंडळ आणि शिवप्रदेश प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कामाची जिल्हाभर चर्चा सुरु आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे  जावळीत पहिला करोनाचा रुग्ण निझरे येथे सापडला.त्यानंतर तालुक्यातील बहुतेक सर्व व्यवहार ,कामकाज ठप्प झाले. 

लॉकडाउन असल्याने या भागातील अनेक व्यवहार बंद झाले. यातच येथील काही पिठाच्या गिरण्या , भात कांडप मशीन देखील  बंद राहिल्याने नागरिकांना पीठ दळून मिळणे, भाताचे तांदूळ करून मिळणे अवघड होणार होते . नागरिकांची गैरसोय पाहता मूळचे मोहाट  येथील रहिवासी असलेले साताऱ्यातील  ॲडव्होकेट अनिल देशमुख यांनी घरची  गिरणी स्वतः चालू करून आपल्या पदाचा, व्यवसायाचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता सेवा दिल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. लॉकडाऊन काळात रोज ४ ते ५ तास गिरणी चालवून तसेच गिरणीबरोबर शेतीची कामे करून सर्वांपुढे आदर्श ठेवला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

जावळी परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्याने अत्यावश्यक सेवांनादेखील निर्बंध  आले होते . एकामागोमाग एक  करोनाचा संसर्ग झाल्याने अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या अनेकांनी आपले व्यवसाय स्वतःहून बंद ठेवले. या भागात असणाऱ्या  काही पिठाच्या गिरण्यादेखील बंद राहिल्या. त्यामुळे नागरिकांना आपले दळण दळण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती.

दरम्यान अनिल यांची वडिलोपार्जित पिठाची गिरणी आहे.अनिल यांच्या मातोश्री  कांताबाई शंकर देशमुख यांनीही गिरणी चालवून गावकऱ्यांना दिलासा दिला.मोहाट पंचक्रोशीतील ही पहिली गिरणी असून १९६० च्या दशकापासून अविरत सेवा देत आहे. देशमुख यांचे आजोबा संपतराव धनावडे पाटील यांनी भाताच्या पिकाचे उच्च्यांकी उत्पादन घेतल्याबाबत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून त्यांना प्रगतिशील शेतकरी म्हणून गौरविले गेले होते. या सर्व पार्श्वभूमीवर अनिल  आणि त्यांच्या मातोश्री कांताबाई शंकर देशमुख यांच्या सेवेचे जावळीत कौतुक होत आहे.     

जिल्हा प्रवास बंदी उठल्यावर त्यांचा सत्कार पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवप्रदेश प्रतिष्ठानच्या वतीने जब्बार पठाण ,राजू नलवडे,संजय शेलार ,विनोद पार्टे यांनी पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT