पुणे : नववी आणि अकरावीचे निकाल तयार करण्याची घाई कशासाठी? लॉकडाऊनच्या काळात, हे कसे शक्य आहे का? सरकारने अशा कामांसाठी शिक्षकांना त्रास देऊन वेठीस धरू नये, असे मत माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
लॉकडाऊनच्या पाश्वभूमीवर तावडे यांनी झूप अॅपद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ऑनलाइन शिक्षण, अकरावी प्रवेश, विद्यार्थ्यांचे स्थलांतर यांसह विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दहावी, बारावीच्या निकालाच्या कामाचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा, अशी मागणी त्यांनी केली. या दोन्ही परीक्षांचे पेपर लवकर तपासून झाले, तरच निकाल वेळेवर लागतील. त्यामुळे या परीक्षांच्या कामासाठी विशेष परवानगी शिक्षण विभागाने काढून घ्यावी, असे ते म्हणाले.
आता दारू संपते की काय, अन् मग झाली बाणेर-बालेवाडी परिसरात एकच गर्दी
दहावीचा एक पेपर राहिला आहे. त्याचे गुणांकन कसे होणार, त्यानंतर अकरावीचे प्रवेश कसे केले जाणार, त्यात राज्य बोर्डाच्या आणि अन्य बोर्डांच्या विद्यार्थ्यांना कसे प्रवेश मिळणार, याचे धोरण सरकारने तातडीने जाहीर करावे, असे तावडे म्हणाले. जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मोबाइलच्या माध्यमातून शक्य नाही, त्यासाठी दूरचित्रवाहिनी सुरू करावी, अशी सूचना त्यांनी केली.
पुणे : सिंहगड रस्ता परिसरात मद्य विक्रीच्या दुकानांसमोर तळीरामांची गर्दी
शिक्षण संचालकांना नववी आणि अकरावीचे गुण विद्यार्थ्यांना एसएमएस वा डिजिटल माध्यमातून कळविण्यास सांगितले आहे. लॉकडाऊनमुळे शिक्षक शाळेत जात नाहीत, मग ही घाई कशासाठी? या काळात सर्व विषयांचे पेपर तपासणे, त्याचे गुण एकत्र करून गुणपत्रिका विद्यार्थ्यांना पाठविणे शक्य नाही. त्यामुळे शिक्षकांना नाहक त्रास होईल, असे विषय शिक्षण विभागाने आणू नयेत, असे त्यांनी नमूद केले.
पुणे : वाईन शॉपी, बिअर शॉपी केव्हा राहणार खुली?..वाचा सविस्तर
उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन असतो, त्यांना ऑनलाइन शिक्षण देणे शक्य आहे. त्यासाठी विद्यापीठांनी अभ्यासक्रम तयार पुढाकार घेतला पाहिजे. मूक्ससारखे (मॅसिव्ह ऑनलाइन ओपन कोर्स) अभ्यासक्रम चालवावे लागतील, त्याची तयारी विद्यापीठांनी केली पाहिजे, असे तावडे म्हणाले.
डीएसकेंच्या कुत्रे अन् मांजरांबाबत न्यायालयात काय झाले वाचा...
अभ्यास कमी करावा
कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवर पुढील काहीकाळ परिणाम होणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष हे छोटे सहा-सात महिन्यांचे असणार आहे. त्यामुळे कोणत्या विषयांचा अभ्यासक्रम कमी करायचा याचा निर्णय तज्ज्ञांना घ्यावा लागेल, त्यासाठी शिक्षण विभागाने तातडीने पाऊले उचलावीत, तसेच अनेक ठिकाणी शिक्षक कमी आहे. विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी तावडे यांनी केली.
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. शाळांपुढेही शिक्षकांचे पगार कसे करायचे, हा प्रश्न आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी शाळेचे शुल्क भरावे.
- विनोद तावडे (माजी शिक्षणमंत्री)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.