Concerned employees and farmers during Panchnama at Chinoda Shivara.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Storm Damage : तळोद्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण; 160 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Storm Damage : तालुक्यात रविवारी (ता. ४) अचानक आलेल्या वादळी वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त भागात महसूल व कृषी विभागाच्या पथकाने पंचनामे पूर्ण केले आहेत. (Due to storm in Taloda Panchnama of damages complete nandurbar news)

पंचनाम्यानुसार वादळामुळे तालुक्यातील सुमारे दीडशे हेक्टरवरील केळी पिकाचे तर जवळपास चारशे घरांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. पंचनामे पूर्ण झाल्याने आता प्रशासनाने संबंधितांना त्वरित नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न करावेत अशी आशा नुकसानग्रस्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गुजरातमध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे तळोदा शहरासह तालुक्यातील ठिकठिकाणी रविवारी (ता. ४) सकाळी अचानक वादळी वाऱ्यांनी जोरदार हजेरी लावली होती. यादरम्यान पावसाचा जोर कमी असला तरी दोन तास चाललेल्या वादळी वाऱ्यांचा थैमानात सातपुड्यातील खर्डी बुद्रुक, लक्कडकोट, केलवापाणी, कोठार, गढीकोठडा, सावरपाडा, धनपुर, रानापूर, राणिपूर, बंधारे,

वाल्हेरी, इच्छागव्हाण, ढेकाटी तसेच तळवे, तऱ्हाडी, बोरद, आमलाड परिसरातील नागरिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून त्वरित नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून वादळाची तीव्रता जास्त असल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. जवळपास चारशेच्यावर घरांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे विशेषतः केळी पिकाचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे शेतांमधील उभे केळीची झाडे जमिनीवर आडवी पडली. तसेच, केळीचे घडच्या घड फेकले गेले होते.

जवळपास अडीचशे शेतकऱ्यांचा १५८ हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. यात आमलाड, मोड, बोरद, तळवे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तसेच १६० हेक्टरवरील फळबागांचे देखील नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले तर काही कोसळले होते. यामुळे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा देखील खंडित झाला होता.

विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर परिश्रम घेत आहेत. त्यामुळे आता अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे.

शेतकऱ्यांवर अनेकदा आपत्ती

तळोदा तालुक्यात गेल्या चार महिन्यात अनेकदा नैसर्गिक आपत्ती अथवा अवकाळी पावसामुळे सातत्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची मदत मिळत नाही तोच पुन्हा दुसरी आपत्ती शेतकऱ्यांवर ओढवत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून येणाऱ्या खरीप हंगाम तरी आता चांगला जावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

केळी उत्पादक शेतकरी संकटात

वादळी वाऱ्याच्यावेळी काही शेतकऱ्यांची केळीची कटाई करण्यात येत होती आणि केळी बांधावर ठेवली जात होती. तर काही शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांशी बोलणे सुरू होते. अशा स्थितीत अचानक वादळ आल्याने सारे काही जमीनदोस्त झाले आहे.

नुकसान झालेली केळी तसेच खराब झालेली केळी आता व्यापारी मातीमोल किमतीने घेतील. त्यामुळे साहजिकच केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Google Gemini AI Photo Prompt: तेच ते प्रॉम्प्ट वापरून कंटाळला आहात? सुंदर फोटोसाठी स्वत:च बनवा 'असे' क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT