fine for those who cut down wet tree reward for those who find it in baripada dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Wild Vegetable Competition : बारीपाड्याची यशोगाथा! ‘ईरा’तून जंगलाची राखण; टाळल्यास दंड

भिलाजी जिरे

Wild Vegetable Competition : आदर्श बारीपाड्याची यशोगाथा समाजासमोर येण्यासाठी शिल्पकार चैत्राम पवार व ग्रामस्थांना अनेक कष्ट उपसावे लागले. यात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रगतिशील मानसिकतेच्या बळावर त्यांना ही किमया साधता आली.

बारीपाड्याची नैसर्गिक संपदा म्हणजेच जंगल संरक्षणासाठी अख्खे गाव सरसावले. जंगल राखण्यासाठी दोन रखवालदार ठेवले. त्यांना प्रत्येक ग्रामस्थ ईरा म्हणजे धान्य स्वरूपात वर्षाचे मानधन देतात.

शिवाय प्रत्येक घरातील एका व्यक्तीस रात्री जंगल संरक्षणासाठी दिवटी (राखण) असते. त्यात आठ ते दहा जण असतात. अशा दिवट्या वर्षभर सुरूच असतात. जो दिवटी करणार नाही त्याला दंड आकारला जातो. (fine for those who cut down wet tree reward for those who find it in baripada dhule news)

आदिवासीबहुल बारीपाड्याची (ता. साक्री) लोकसंख्या नऊशे ते हजारापर्यंत आहे. तेथे कोकणी, मावची व भिल्ल मंडळी गुण्यागोविंदाने नांदतात. त्यांना एकत्र घेत चैत्राम पवार यांनी बारीपाड्याचा कायापालट करण्याचा विडा उचलला.

शेतकरी व निरक्षर कुटुंबात जन्मलेले श्री. पवार यांनी अपार कष्ट, मेहनतीने एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांना नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या; परंतु गावासाठी व तुझ्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, असा त्यांना त्यांच्या मित्राने सल्ला दिला.

उजाड माळरान

बारीपाडा म्हणजे उजाड माळरान, परिसरात वृक्ष, विहिरी, मळे नव्हते. फक्त पावसाळी शेतीवर गाव अवलंबून असे. पावसाळा संपला की ग्रामस्थ रोजगारासाठी मिळेल तिथे कामाला जात. तेथून परतल्यानंतर पावसाळी पिकांची तयारी करायची.

खत टाकायचे, नांगरणी, वखरणीतून शेती तयार करायची, असा दिनक्रम असे. सद्यःस्थितीत गावात सर्वच शेतकरी दुबार पीक घेतात. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत. भाजीपालाही पिकवितात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परिवर्तनाची कहाणी

बारीपाड्याच्या परिवर्तनाला १९९१ पासून सुरवात झाली. वनवासी कल्याण आश्रमातील मित्राचा सल्ला घेत व गावातील दोन-चार मित्रांना सोबत घेत एकमेकांशी सल्लामसलतीतून गावालगत जंगलात होणारी वृक्षतोड थांबविण्यास श्री. पवार यांनी सुरवात केली. त्यामुळे जंगल आकारास येऊ लागले. पिंपळनेर येथील वन विभाग व बारीपाडा ग्रामस्थांनी समन्वयातून जंगल संरक्षणाचा निर्णय घेतला.

त्यातून १९९२ ला वनसंरक्षण समितीची स्थापना झाली. जंगल संरक्षणासाठी नियमावली तयार करण्यात आली. त्यात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, तसेच ओले (जिवंत) झाड तोडल्यास दंड, झाड तोडताना सापडल्यास सापडविणाऱ्यास बक्षीस, अशी योजना अमलात आली. गावातील भांडण गावातच मिटविण्यास सुरवात झाली. त्यातील फलनिष्पत्तीतून घनदाट जंगल उदयास आले. त्याचे संवर्धन होण्यासाठी अनेक यशस्वी प्रयोग सुरू झाले. ते कायम आहेत.

सरपणासाठी सूट

गावाला लागणाऱ्या सरपणासाठी वर्षातून एक महिना सूट दिली जाते. त्यात सुकलेली झाडे, मोठ्या झाडांच्या फांद्या, सुकलेल्या फांद्या, काटेरी झुडपे दिली जातात. अशा उपक्रमशील बारीपाड्यात २६ व २७ ऑगस्टला अनोखा महोत्सव होत आहे. त्यात रविवारी (ता. २७) वनभाजी पाककला स्पर्धा-२०२३ होणार आहे. ती निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT