उत्तर महाराष्ट्र

अमरिशभाईंनी पक्ष बदलल्यामुळे वेदना : खा. सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा

 धुळे ः पवार कुटुंबाशी सख्य, जवळीक, पारिवारीक संबंध असलेले माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षाची (भाजप) वाट धरली. त्यांचा हा निर्णय आमच्यासाठी वेदनादायक आहे. काही अडचणी असल्याशिवाय ते असा निर्णय घेणार नाहीत, असे वाटते. ते जाणण्यासाठीच त्यांची भेट घेणार आहे. त्यांचा आता विचार काय? अशी विचारणा करणार आहे, असे जाहीरपणे सांगत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. नेत्या तथा खासदार सुळे प्रमुख मार्गदर्शक होत्या. प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, इर्शाद जहागीरदार, शहराध्यक्ष कैलास चौधरी, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, संदीप बेडसे, किरण पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, एन. सी. पाटील, डॉ. जितेंद्र ठाकूर, रणजित भोसले, तेजस गोटे आदींसह माजी नगराध्यक्षा हेमा गोटे, माजी महापौर कल्पना महाले, डॉ. सुवर्णा शिंदे, महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोज कदम व्यासपीठावर होते. 

पवारांमागे महाराष्ट्र एकवटला 
खासदार सुळे म्हणाल्या, की पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना "इडी'ची नोटीस आणि त्यांचे पावसातील भाषण यामुळे महाराष्ट्र एकवटला आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याचा परिपाक कुणालाही ध्यानीमनी नसताना मतदारराजाच्या आशीर्वादामुळे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या जवळचे कोण आणि दूरचे कोण ते कळाले. कोण कामाचा तेही समजले. संघटनेची बांधणी करण्यात कमी पडलो, त्यावर आत्मचिंतन करावे लागेल तेही उमगले. 

अमरिशभाईंमुळे धक्का 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी भाऊच आहेत. मात्र, आमचा हक्काचा माणूस माजी मंत्री अमरिशभाई पटेल हे कॉंग्रेस विचारसरणीचे असताना दुसऱ्या पक्षात (भाजप) का गेले ते कळाले नाही? त्यामागची कळत असलेली कारणे धक्कादायक वाटतात. पूर्वीच्या सरकारमध्ये सत्तेचा गैरवापर, दबावतंत्र असल्याने राज्यात काही जणांना आपला पक्ष सोडावा लागला असेल, असे वाटते. भाजप सरकारची उज्ज्वला योजना महिलांना मारक ठरली आहे. मोफत गॅस सिलिंडर तर मिळत नाही, शिवाय स्वयंपाकासाठी रॉकेलचे वितरण बंद करून त्या सरकारने महिला वर्गाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. श्री. गोटे यांच्या मागणीनुसार मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाच्या स्थितीबाबत दिल्लीत पोहोचल्यावर माहिती घेतली जाईल आणि हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करेल. तसेच येथे सफारी गार्डन होण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न होतील, अशी ग्वाही खासदार सुळे यांनी दिली. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी या रेल्वे मार्गाबाबत दिशाभूल चालविली असून जिल्ह्याचा विकास, बेरोजगारी, मागासलेपणा दूर होण्यासाठी रेल्वे मार्ग, तसेच सफारी गार्डनचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी खासदार सुळे यांना साकडे घालतो, तसेच त्यांनी धुळे व नंदुरबार दत्तक घ्यावे, असे श्री. गोटे म्हणाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

प्रतीक्षा संपली! यंदा स्वामी शुक्रवारी नाही गुरुवारीच येणार .. प्रविण तरडेंच्या 'देऊळ बंद २'ची रिलीज डेट समोर; कोण साकारणार मुख्य भूमिका?

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण

Konkan Mango Farmers : कोकणच्या हापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी! राजू शेट्टींच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय, वाशी APMC मधील बैठकीत काय ठरलं?

Latest Marathi News Live Update : पुण्यात महापौरांची आपत्ती व्यवस्थापन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यासोबत बैठक सुरू

SCROLL FOR NEXT