उत्तर महाराष्ट्र

अमरिशभाईंनी पक्ष बदलल्यामुळे वेदना : खा. सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा

 धुळे ः पवार कुटुंबाशी सख्य, जवळीक, पारिवारीक संबंध असलेले माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षाची (भाजप) वाट धरली. त्यांचा हा निर्णय आमच्यासाठी वेदनादायक आहे. काही अडचणी असल्याशिवाय ते असा निर्णय घेणार नाहीत, असे वाटते. ते जाणण्यासाठीच त्यांची भेट घेणार आहे. त्यांचा आता विचार काय? अशी विचारणा करणार आहे, असे जाहीरपणे सांगत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. नेत्या तथा खासदार सुळे प्रमुख मार्गदर्शक होत्या. प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, इर्शाद जहागीरदार, शहराध्यक्ष कैलास चौधरी, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, संदीप बेडसे, किरण पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, एन. सी. पाटील, डॉ. जितेंद्र ठाकूर, रणजित भोसले, तेजस गोटे आदींसह माजी नगराध्यक्षा हेमा गोटे, माजी महापौर कल्पना महाले, डॉ. सुवर्णा शिंदे, महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोज कदम व्यासपीठावर होते. 

पवारांमागे महाराष्ट्र एकवटला 
खासदार सुळे म्हणाल्या, की पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना "इडी'ची नोटीस आणि त्यांचे पावसातील भाषण यामुळे महाराष्ट्र एकवटला आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याचा परिपाक कुणालाही ध्यानीमनी नसताना मतदारराजाच्या आशीर्वादामुळे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या जवळचे कोण आणि दूरचे कोण ते कळाले. कोण कामाचा तेही समजले. संघटनेची बांधणी करण्यात कमी पडलो, त्यावर आत्मचिंतन करावे लागेल तेही उमगले. 

अमरिशभाईंमुळे धक्का 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी भाऊच आहेत. मात्र, आमचा हक्काचा माणूस माजी मंत्री अमरिशभाई पटेल हे कॉंग्रेस विचारसरणीचे असताना दुसऱ्या पक्षात (भाजप) का गेले ते कळाले नाही? त्यामागची कळत असलेली कारणे धक्कादायक वाटतात. पूर्वीच्या सरकारमध्ये सत्तेचा गैरवापर, दबावतंत्र असल्याने राज्यात काही जणांना आपला पक्ष सोडावा लागला असेल, असे वाटते. भाजप सरकारची उज्ज्वला योजना महिलांना मारक ठरली आहे. मोफत गॅस सिलिंडर तर मिळत नाही, शिवाय स्वयंपाकासाठी रॉकेलचे वितरण बंद करून त्या सरकारने महिला वर्गाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. श्री. गोटे यांच्या मागणीनुसार मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाच्या स्थितीबाबत दिल्लीत पोहोचल्यावर माहिती घेतली जाईल आणि हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करेल. तसेच येथे सफारी गार्डन होण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न होतील, अशी ग्वाही खासदार सुळे यांनी दिली. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी या रेल्वे मार्गाबाबत दिशाभूल चालविली असून जिल्ह्याचा विकास, बेरोजगारी, मागासलेपणा दूर होण्यासाठी रेल्वे मार्ग, तसेच सफारी गार्डनचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी खासदार सुळे यांना साकडे घालतो, तसेच त्यांनी धुळे व नंदुरबार दत्तक घ्यावे, असे श्री. गोटे म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT