dust car jalgaon 
उत्तर महाराष्ट्र

अरे बापरे...! हे काय...चक्क दररोज हे गिळतात 100 ग्रॅम धुळ ! 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः शहरात अमृत योजनेमुळे खोदलेल्या खड्डयांमुळे सर्वत्र धुळ उडते आहे. नागरिकांच्या नाकातोंडावाटे रोज सुमारे 100 ग्रॅम धुळ त्यांच्या पोटात जाते आहे. यामुळे भविष्यात नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो. अमृत योजनेचे काम त्वरीत करावे, उडणाऱ्या धुळीवर उपाय करावा अशा मागणीचे निवेदन रविवारी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा अश्‍विनी देशमुख यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले आहे. याबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्‍वासन मंत्री पाटील यांनी दिले. 

केंद्र सरकारने जळगाव शहरासाठी अमृतयोजना मंजूर केली चांगले झाले. त्याची गरज ही होती कारण शहरातील पाईप लाईन आता जवळ-जवळ 30 ते 35 वर्षे जुनी झाली आहे. इतक्‍या दिवसात गंज लागून त्यातून पुर्ण दाबाने पाणी पुरवठा करणे आता शक्‍य होत नाही. जुन्या पाईप लाईन मधून लिकेजच्या माध्यमातून 47 % प्रोसेस केलेले पाणी जमीनीत वाया जात आहे. त्यामुळे अमृत योजनेची शहराला गरज होतीच. परंतू आता हीच अमृत योजना जळगाव शहरातील नागरिकांसाठी रोगापेक्षा ईलाज भयंकर अशी झालेली आहे. 

तत्कालीन सरकारने किंवा महापालिकेने हा विचार का नाही केला की, या योजनेमुळे शहरातील सर्व रस्ते खोदले जाणार आहेत. तेव्हा तेथुन माती बाहेर येणार आहे त्या मातीचे रुपांतर हे धुळीत व चिखलात होणार आहे. याचा नागरीकांना प्रचंड त्रास होऊ शकतो यातून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होईल. तेव्हा अमृत योजनेच्या ठेक्‍यामध्ये अशा अटी का नाही टाकल्या गेल्या की एक तर ही योजना कमीत कमी वेळा पूर्ण करा, नाहीतर खोदलेले रस्ते पुर्ववत डांबरी करण करुन द्या. जेणे करुन नागरीकांना त्रास होणार नाही. इतकी नियोजन शुन्यता अधिकारी व लोकप्रतिनिधी मध्ये कशी असु शकते? आज या धुळीमुळे जळगावकर त्रस्त झाले आहे. असे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी सेल अर्बनच्या जिल्हाअध्यक्ष सौ. देशमुख, मुविकोराज कोल्हे, कल्पीता पाटील, युगल जैन, शुभम पाटील, मिलींद सोनवणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT