उत्तर महाराष्ट्र

वाढता आकडा थोपविण्यासाठी हवा "नाशिक पॅटर्न'! 

सकाळवृत्तसेवा

जळगावः "कोरोना व्हायरस'चे संकट सर्वदूर पसरले आहे. एकवेळ "ग्रीन झोन'मध्ये आलेला जळगाव जिल्हा "रेड झोन' झाला आणि म्हणता म्हणता एक- एक परिसर "हॉटस्पॉट' होऊ लागले; परंतु "कोरोना'चा वाढता आकडा थोपविण्यासाठी नाशिकमध्ये ज्याप्रमाणे "लॉकडाउन'चे कडक पालन झाले, तेच अमळनेर शहरातही करण्यात आले. यामुळे काहीसे दिलासादायक चित्र या दोन्ही शहरांमध्ये पाहण्यास मिळू लागले आहे. जळगावमध्ये मात्र चित्र उलटे असून, "पॉझिटिव्ह' रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. 

"कोरोना व्हायरस'चा प्रादुर्भाव वाढत आहे. यात जळगाव जिल्हा अडीचशेचा पल्ला गाठण्याच्या जवळ आला असून, अवघ्या काही दिवसांत हा आकडा पाचशेच्यावर पोचण्याची भीतीही व्यक्‍त केली जात आहे. हा वाढणारा आकडा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाकडून ज्या उपाययोजना करणे किंवा "लॉकडाउन'चे कडक पालन करणे आवश्‍यक आहे. मात्र, जिल्ह्यात अशा प्रकारचे चित्र पाहण्यास मिळत नाही. "लॉकडाउन' असतानाही नागरिक बिनधास्तपणे रस्त्यांवरून फिरत आहेत. भाजीपाला घेण्यासाठीही गर्दी करीत असतात. यामुळे जळगाव शहरातच नव्हे, तर जिल्ह्यातील नवीन ठिकाणी "कोरोना'चे रुग्ण आढळून येत आहेत. 

नाशिकमध्ये 40 दिवसांचा "लॉकडाउन' 
राज्यात "कोरोना'चे रुग्ण वाढण्यामध्ये नाशिक जिल्हा सर्वांत पुढे होता; परंतु सद्यःस्थितीचे चित्र पाहिल्यास वाढता प्रादुर्भाव काही प्रमाणात रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. जेथे जिल्ह्यात रोजचे 40- 50 "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून यायचे; तेथे आज 15- 16 रुग्ण "पॉझिटिव्ह' येत आहेत. याला कारण म्हणजे नाशिकमध्ये "लॉकडाउन'चे काटेकोरपणे पालन करण्यात आले. "कोरोना व्हायरस'च्या पार्श्‍वभूमीवर देशात पहिला "लॉकडाउन' 23 मार्चपासून लागू करण्यात आला होता. तेव्हापासून तीन मेपर्यंत म्हणजेच चाळीस दिवसांचा "लॉकडाउन' काटेकोरपणे पाळण्यात आला. यात जिल्हा प्रशासनाकडून कडक नियम लावून नियम तोडणाऱ्यास दंड करण्यात आला. हेच काम नाशिक महापालिका प्रशासनाने केले. ज्या परिसरात एखादा रुग्ण "पॉझिटिव्ह' आला; तो भाग अगदी 14 दिवसांसाठी "सील' करण्यात येत होता. 

अमळनेरकरांचा "जनता कर्फ्यू' 
जिल्ह्याचा विचार केल्यास अमळनेर "हॉटस्पॉट' ठरला होता. जिल्ह्यातील एकमेव तालुक्‍याचे शहर हे शंभरी पार करणारे ठरले. अमळनेर शहरातील आकडा रोजचा वाढत असताना अवघ्या पंधरा दिवसांत शंभर रुग्ण झाले. यानंतर तेथे दोन टप्प्यांत आठ दिवसांचा "जनता कर्फ्यू' लावण्यात आला. यात भाजीपाला, किराणा दुकानांसह मेडिकलदेखील बंद ठेवण्यात आली होती. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना दंड आकारणी झाली. यामुळे सद्यःस्थितीत शहरातील "कोरोना पॉझिटिव्ह' आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. "कंटेन्मेंट झोन'मध्ये "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णाच्या संपर्कातील कोणीच आढळून येत नसल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. 

जळगावात कधी होणार अंमलबजावणी? 
"कोरोना व्हायरस'ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या शहरातील वेगवेगळ्या भागांतून वाढत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाकडून कडक नियम लागू करण्यात येत नाहीत. नाशिक व अमळनेर येथे राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसारखे कोणतेही चित्र जळगाव महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून होत असल्याचे पाहण्यास मिळत नाही. नागरिकांमध्ये पोलिस किंवा प्रशासनाची कोणत्याही प्रकारची भीती नसल्याने बिनधास्त फिरत आहेत. परिणामी "कोरोना'चा आकडा वाढत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT