उत्तर महाराष्ट्र

कोरोना संकट जावे यासाठी संपूर्ण गाव रमले 'राम' नामस्मरणात

गावात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट सर्वत्र पसरले आहे. या लाटेत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.

रमेश पाटील

सारंगखेडा : वारंवार कोरोनाच्या बातम्या ऐकून मानसिक संतुलन बिघडविण्यापेक्षा कोरोनादूतांसाठी, तसेच महामारीतील मृतात्म्यांना चिरशांती लाभावी व त्यांच्या परिवाराला जगण्याचे बळ मिळावे आणि कोरोनाला कायमस्वरूपी दूर ठेवावे या दृष्टिकोनातून सुजालपूर (ता. नंदुरबार) गावात श्रीरामनामजपाचा उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविला जात आहे.

रामनामात मोठी शक्ती आहे हे रामायणातून मारुतीरायाने जगाला दाखवून दिले आहे. तसेच रामदास स्वामींनीही रामनामाचे महत्त्व विशद केले आहे. तोच प्रकार सुजालपूर येथील ग्रामस्थांनी अवलंबून कोरोनाच्या कालावधीमध्ये घराबाहेर जाण्याऐवजी घरातच रामनामाचा जप करावा आणि आपले आध्यात्मिक जीवन सुयोग्य मार्गाला लावण्याबरोबरच कोरोनालाही कायमस्वरूपी दूर ठेवावे या दृष्टिकोनातून राम, रामचे नामस्मरण करण्याचे उपक्रम राबवीत आहे.

गावात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट सर्वत्र पसरले आहे. या लाटेत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, वारंवार कोरोनाच्या बातम्या, चर्चा यांमुळे पुरुषांसह महिला वर्गाची मानसिकता खराब होत होती. या सर्वांना यातून बाहेर काढण्यासाठी गावात भगवंताचे नामस्मरण करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनामुळे सुजालपूर गावात घाबराटीचे वातावरण तयार झाले आहे. खास महिला वर्गात मानसिकता खराब करून घेतात व मन एकसारखे कोरोनाच्या बातम्या किंवा चर्चा ऐकून विचलित होत होते. त्यांचे मन वळावे व त्यांना भगवंताचे नामस्मरण व्हावे व आपला वेळ भगवंतांच्या नामस्मरणात जावा, तसेच गावावर व जगावर आलेल्या संकटाला घालविण्यासाठी डॉक्टर व मेडिकलची टीम देवदूत बनून काम करीत आहेच. पण श्रीराम नामस्मरण व वहीवर लिखाण करून संकटाचा नायनाट करण्याची ही विनंती भगवंतास करावी यासाठीच उपक्रम गावात सर्वसंमतीने सुरू केला आहे. जे लोक आपल्या सोडून गेले त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी व परिवारास जगण्याचे बळ मिळावे ही इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. परिसराचे ब्रह्मलीन संतश्री दगडूजी महाराज यांच्या प्रेरणेतून या उपक्रमास पुरुषांसह महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

गावात प्रत्येकाच्या घरी राम राम राम नावाचे लिखाण करून नामस्मरण करण्यात येत आहे. कोरोनाची भीती निर्माण झाल्यामुळे ती काढण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

प्रवीण पाटील, ग्रामस्थ, सुजालपूर (ता. नंदुरबार)

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT