उत्तर महाराष्ट्र

शहादा तालुक्यात वादळी पावसामुळे कापूस, केळी, ऊसाचे नुकसान

कमलेश पटेल

शहादा : गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रायखेड (ता. शहादा) परिसरात मोठ्या प्रमाणावर केळीचे नुकसान झाले आहे. वादळामुळे केळीचे घड कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे हजारो केळीचे खांब जमीनदोस्त झाली. पिकासाठी केलेला लाखो रुपये खर्चही गेल्याने शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

गेल्या आठवड्यात तीन-चार दिवस वादळ वाऱ्यासह रोज पाऊस पडत असून, पिकांचे नुकसान झाले आहे. याअगोदर मूग, उडीद हातचा गेला आहे. आता कापूस व ऊस आडवा झाला आहे. त्याचबरोबर बहरात असलेले केळी पीकही उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. 

रायखेड (ता. शहादा) शिवारात केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. अत्यंत महागडे व खर्चिक असलेले हे पीक क्षणार्धात उद्ध्वस्त झाले. सध्या केळीला घड लगडलेले असून, ते पक्व होण्याचा मार्गावर आहेत. अत्यंत महागडी रोपे आणून शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती. त्याचबरोबर महागडी खते व फवारणी केलेली असताना डोळ्यांसमोरच पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहून शेतकरी हतबल झाला आहे. आता शासनाकडून पंचनामे होऊन नुकसानभरपाईची प्रतीक्षा लागून आहे. 

संकटात भर... 
गेल्या वर्षी रब्बी हंगामात निघालेले उत्पादन कवडीमोल भावाने विकावे लागले. यंदा खरीप चांगला येईल म्हणून शेतकऱ्यांनी उधार, उसनवारी करून, तसेच कर्ज काढून पुन्हा नव्या उमेदीने शेती कसायला सुरवात केली. मात्र, अचानक आलेल्या अस्मानी संकटाने शेतकऱ्याला पुन्हा मारले. ज्वारी काळवंडली आहे. कपाशीचे बोंडे सडली आहेत. ऊस, केळी भुईसपाट झाली आहे. शेतकरी पूर्णतः हताश झाला आहे. प्रशासनाने गांभीर्य घेत पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. 

 
यंदा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस खराब झाला. ऊस आडवा झाला. काही ठिकाणी केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. 
-अभिजित पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती 

वाचा ः धुळे जिल्ह्यात खासगी लॅबचा पॉझिटिव्हिटी रेट तुलनेने वरचढ 

माझ्या शेतात केळीच्या पाच ते सहा हजार झाडांची लागवड केली आहे. त्यावर लाखो रुपयांचा खर्चही झाला. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळीची सुमारे हजारावर झाडे जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी. 
-हिरालाल पाटील, शेतकरी, रायखेड (ता. शहादा)  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT