bhujbal-6.jpg 
नाशिक

"पाच वर्षे काम न केल्यानेच भाजपवर आंदोलनाची वेळ" - भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारतीय जनता पक्षाने पाच वर्षांत कामे केली असती, तर कदाचित आज त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली नसती. लोकशाही असल्याने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. या आंदोलनाकडे आम्ही सकारात्मकतेने पाहतो. काहीतरी अडचणी असल्याशिवाय कोणी सत्याग्रह करत नाही. मात्र, पाणीप्रश्‍नावर आंदोलनाऐवजी सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्‍यकता असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 


मराठवाड्यातील भाजप नेत्यांच्या सत्याग्रहावर टीका 

मराठवाड्याच्या पाणीप्रश्‍नासाठी औरंगाबादला माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात विचारले असता, भुजबळ म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन अवघे दोन महिने झाले आहेत. नाशिकमधून मराठवाड्याला यंदा तब्बल 111 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मराठवाड्याला कमी पाणी गेलेले नाही. पाणीप्रश्‍नावर आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्राला अधिकाधिक पाणी कसे मिळेल, यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची आता गरज आहे. राज्यात पडणाऱ्या पावसातील सुमारे दीडशे ते दोनशे टीएमसी पाणी गुजरातला वाहून जाते. यापूर्वीही मी सभागृहात महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याबाबत आवाज उठविला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातला पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही, असे आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठीचा सामंजस्य करार बदलला. 

हेही वाचा > रखडलेल्या कामांसाठी 185 कोटी - भुजबळ ​

पाणीप्रश्‍नी लवकरच बैठक 
ज्या भागात पाणी पडते, ते पाणी त्या राज्याचे हा नियम आहे. त्यानुसार आपल्या जमिनीवरचे पाणी आणले तर राज्याच्या प्रश्‍न मार्गी लागू शकतो. गुजरातला एकही थेंब पाणी जाता कामा नये, याकरिता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यातून नाशिकसह मराठवाडा आणि राज्याचाही प्रश्‍न सुटू शकेल. यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली असून, लवकरच एक स्वतंत्र बैठक घेणार आहोत. बैठकीत या विषयातील तज्ज्ञ, लोकप्रतिनिधींचा समावेश असेल. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी वळविण्यासाठी एक योजना तयार केली जाणार आहे. याकरिता मोठा खर्च आहे; परंतु पाणी निघून गेले तर आहेच, त्याच पाण्यात गरज भागवावी लागेल. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून निर्णय घेऊन राज्याचा पाणीप्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT