District Collector jalaj sharma statement about Meri Mati Mera Desh initiative nashik news esakal
नाशिक

Nashik District Collector : ‘माझी माती, माझा देश’ अभियान आजपासून : जिल्हाधिकारी जलज शर्मा

सकाळ वृत्तसेवा

Nashik District Collector : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना वंदन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’हे अभियान राबविण्यात येणार आहे.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. (District Collector jalaj sharma statement about Meri Mati Mera Desh initiative nashik news)

जिल्हाधिकारी म्हणाले, ९ ते २० ऑगस्ट २०२३ दरम्यान हे अभियान गाव आणि गटस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, नगरपंचायत, तसेच महापालिका क्षेत्रात आयोजित करण्यात येणार आहे. शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देऊन नमनासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक ‘शिला फलक’उभारण्यात येणार आहे.

पालिका, महापालिका क्षेत्रात एक असे शिला फलक (स्मारक फलक) उभारण्यात येतील. त्यावर स्थानिक शहीद, वीर, स्वातंत्र्यसैनिकांची नावे असतील. हे शिला फलक १५ ऑगस्टपर्यंत उभारण्यात येतील. ‘वसुधा वंदन’ उपक्रमात प्रत्येक गावात योग्य ठिकाण निवडून तेथे ७५ देशी रोपांची लागवड करून ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहे.

देश, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या वीरांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा, त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियान १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रत्येक नागरिकाने आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

पंचप्रण उपक्रमात शपथ

‘पंचप्रण’ (शपथ घेणे) या उपक्रमात प्रत्येक शासकीय कार्यालयात मातीचे प्रज्वलित दिवे हातात घेऊन शपथ घेतली जाणार आहे. ‘ध्वजारोहण’ कार्यक्रमात अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत अशा एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात येतील.

स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचतगट, शेतकरी मंडळ यांना सहभागी करून घ्यावेत. प्रत्येक गावस्तरावर ९ ते १५ ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. १६ ते २० ऑगस्ट या कालावधीत महापालिका, पालिका, पंचायतस्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Chh. Sambhajinager Crime: बहुत केस लढ रहा हैं तू; तू खतम, केस खतम, न्यायालयाबाहेर केला ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी १४ ऑक्टोबरला मोर्चा काढणार

SCROLL FOR NEXT